अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४२
क्रमशः पुढे चालू......
रात्रीच्या अंधारातून वाट काढत त्या भुयारात शिरल्या. कोणत्या ठिकाणी दिवट्या असतात याचा त्यांना अंदाज होता. त्यांनी त्या जागा चाचपल्या. तेव्हा त्यांना ती जागा सापडली. त्यांनी तेथील दिवळीतील तेल घालून ती दिवटी पेटवली. व त्या निघाल्या. त्या माग काढत महालाजवळ आल्या. पायऱ्या चढूण त्या वर गेल्या. त्या पायऱ्या ओळखीच्या होत्या. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्या चडून त्या राजप्रासादाजवळील त्या गुप्त दरवाजा जवळ आल्या मासोळी विरुद्ध दिशेने होती. पण मासोळीच्या विरुध्द बाजूला एक चक्र होते. ते त्या दोघींनी फिरवण्यास सुरवात केली. खूप दिवस दरवाजा उघडला न गेल्यामुळे तो उघडणे अवघड होते. पण खूप प्रयत्न करून शेवटी त्या दोघींनी तो उघडला. त्या खोलीत आल्या. व तेथून जवळील अंबालाच्या स्नानगृहातून आत आल्या. तिथे आल्यावर ते रांजण त्यांना दिसले. ज्या स्नानगृहात अंबाला स्नान करत होती. तेथून त्या पुढे दालनात आल्या. जिथे अंबाला निद्रा घेत असे. त्यांनी पाहिले तिथे कोणतरी झोपले होते. अंबालेने दिवटीच्या उजेडात पाहिले ती उत्तर नगर नायकाची मुलगी होती. तिला खूप राग आला. व ती तिला मारणार इतक्यात त्रिशलेने अंबालास मागे खेचले. व आपल्या जवळील शिशितील औषध रुमालात घेऊन त्या मुलीस बेशुद्ध केले. तेथून त्या पुढे सरकल्या. तो महाल त्यांच्या परिचयाचा होता. वाटेतील शिपायांना बेशुद्ध करत मारत त्या दोघी प्रधानाच्या दालनात आल्या. तिथे वेददत्त झोपले होते. शेजारी शामलता ही होत्या. त्रिशलाने दासींना व इतर सैन्यांना बेशुद्ध केले. तसेच महाराणी श्यामलता यांना ही बेशुद्ध केले. व त्या दोघी झोपलेल्या महाराज वेददत्त यांजवळ आल्या. व त्यांना जागे केले. त्यांनी जागे झाल्यावर पाहिले की त्यासमोर दोन कृष्ण पोशाख घातलेल्या तरुण युवती होत्या तयांच्या हाती तलवारी होत्या.
त्यांना पाहताच महाराज वेद दत्त, “ कोण आहात, व असे माझ्या कक्षात येऊन माझ्यावर हल्ला करण्याचे धाडस करून तुम्ही जिवंत सुटाल असे वाटते.”
अंबाला , आपली तलवार दाखवत, “ओळखते का ही तलवार तुम्हाला? यमसदनी पाठवणेसाठी आलोय आम्ही. तुमचा साक्षात काळ बनून महाराज वेददत्त.”
महाराज वेददत्त, “ पण मी तुमच्या वर कोणता असा अन्याय केलाय ते सांगा.”
अंबाला, “ संपूर्ण राज्य घशात घातले. अन् वरती मानभावी बोलणे करता शोभत नाही आपल्याला, स्वतःच्या राजाशी असा दगा फटका करून निर्दोष असल्याचा आव आणू नका.”
महाराज वेददत्त, “ पण मी हे राज्य माझ्या मनगटाच्या व हिंमतीच्या बळावर घेतलेय. तुमचा यासी संबंध काय?”
अंबाला व त्रिशला तोंडावरील घोषा काढतात.
त्रिशला, “ पहा या चेहऱ्यांना ओळखता का? ओळखत नसाल तर ओळख करून देते. मी आहे दासी देवकीची सुता त्रिशला, व ही आहे कृष्णरुपधारी अंबाला, राजकुमारी अंबाला.”
अंबाला हे नाव ऐकताच वेददत्त आश्चर्याने
“ तू जिवंत आहेस, खूप बरे वाटले. पण तू तर त्या हल्यात मरण पावली होतीस ना. मग ती प्रेते कुणाची?”
अंबाला, “ तुम्ही आम्हाला मारण्याचा चांगलाच प्रयत्न केला होता. पण परमेश्वराला ते मान्य नव्हते. महादेव कृपेमुळे मी वाचले. पण तुमच्या दगाबाजीमुळे महाराणी अरुणावतींना प्राण गमवावा लागला.”
महाराज वेददत्त, “ पण या घटनेशी माझा तिळमात्र संबंध नव्हता. मी तेव्हा उत्तर स्वारीवर होतो.”
अंबाला, “ हो तुम्ही उत्तर स्वारीवर होताच पण त्याच दरम्यान आचार्य वृषभ व दक्षिण नगर नायकाशी संधान साधून होतात. व तुमच्या सांगण्याने त्यांनी राजधानी नगरावर हल्ला चढवला. व त्यावेळी नगराचे रक्षण करताना महाराणी अरूणावतीना वीरमरण आले. पण तुमचाच डाव नगर नायकाने उलटवला. व तुम्हास राजा मानण्यास नकार दिला. तेव्हा आचार्य वृषभ यांच्या आश्रमावर हल्ला चढवून शक्तिहीन करून आपला स्वार्थ साधलात. व राजे झालात.”
महाराज वेददत्त, “ पुराव्या अभावी फक्त आपला क्रोधाग्नी शमविण्यासाठी तुम्ही माझ्यावर आरोप करीत आहात. तू म्हणत असशील तर आताच या घटकेला मी या राजेपदाचा राजीनामा देतो.”
अंबाला, “ ज्या राज्याने माझे माता पिता हिरावून घेतले. ते राज्य माझ्या काय कामाचे. व पुरावा म्हणत असाल तर तो मी बरोबर आणलाय. वाच त्रिशले ते पत्र जे प्रधान वेददत्त यांनी दक्षिणनगर नायकास लिहिले होते.
त्रिशलाने ते पत्र काढले. व ती वाचू लागली
महाशय,
दक्षिणनगर नायकास आपला मित्र वेददत्त यांचा नमस्कार असो. महाराज जयवर्धन हे कर्काच्या नांगीत व मगरीच्या तिड्यात सापडल्यासारखे झाले आहेत. उत्तर सीमेवर होणारे हल्ले परतवण्यासाठी मी महाराज जयवर्धन यांसमवेत जात असून सदर राजधानी नगराचा ताबा तुम्ही घ्यावा. व यासाठी आपले आप्त आचार्य वृषभ यांची मदत घ्या. बाकीचे नंतर पाहू.”
आपला मित्र प्रधान
वेद दत्त.
वेददत्त यांनी ते मोहोर बंद पत्र पाहिले. तेव्हा ते म्हणाले हे पत्र मी दिलेले नाही.
अंबाला , “ शिक्का तर आपलाच आहे.”
महाराज वेददत्त, “ तरी ही हे पत्र माझे नाही. असे म्हणत त्यांनी आपल्या शेजे शेजारी असणारी तलवार घेण्याचा प्रयत्न केला. तोच अंबालेने त्यांच्या हातावरवारर केला. इतक्यात त्रिशलाने ती तलवार दूर केली. व त्यांना म्हणाली, “महाराज वेद दत्त मी दासी देवकी ची सुता. जिच्यावर आपण अनन्वित अत्याचार महालात करत होतात. ते मी पाहिलेत. त्याच काय.”
महाराज वेददत्त, “ तुझ्या मातेने जे काही मज दीले ते काही उपकार नाही केले. ती एक दासी होती. जी आपल्या मुलीला घेऊन दारोदार भिक मागत होती. मी तिला आश्रय दिला. दोन वेळचे अन्न दिले. तुला राजमहालात ठेवली. व तिने मला जे दिले ते स्वइच्छेने या उपकाराची परतफेड होती.”
इतक्यात एक तीर वेगाने आला व त्याने महाराज वेद दत्त यांच्या कंठाचा वेध घेतला.
अंबालेने त्रिशलेस इशारा केला. त्रिशलेने वेगाने हालचाल केली व कमरेची धारदार भाल्यासारखी निप घेऊन तिने ती अचूक फेकली. ती त्या मारेकऱ्यास लागली. तो जागीच ठार झाला. त्या दोघी वेददत्त यांजवल गेल्या. पण ते मृत झाले होते. इतक्यात महालातील सैन्य सावध झाले. ते वेद दत्त यांच्या दालनात आले. त्यांनी महाराजांना मृत पाहिले. व त्यांनी शिबंदीचा पहारा कडक केला. एकच दंगा झाला. त्या दोघी सावध होऊन पुन्हा माघारी निघाल्या. व गुप्त मार्गात शिरल्या. त्यांचा मागोवा घेत काही सैन्य त्या गुप्त मार्गात शिरले. इकडे एक घोडेस्वार वेगाने महादेव नगराकडे महारुद्राला संदेश देण्यास गेला. संदेश मिळताच तो वेगाने महलाकडे निघाला. वाटेत विचार करता त्याच्या लक्षात आले की महालाचा पहारा कडक असताना मारेकरी कुठून गेले.
क्रमशः पुढे....

No comments:
Post a Comment
This is not government websites only private , here deta is a calect to gather our saround see and hearing deta so you check to government websites and agree whit it.