अंबाला भाग २९
क्रमशः पुढे चालू....
महाराज जयवर्धन हे प्रचंड सैन्यानिशी गंगेश व राजा नागदूर्ग वर चालून गेले. तेथे अश्मक खोऱ्यात त्यांचे शत्रू सैन्याशी प्रचंड असे युद्ध झाले. त्यामध्ये नागदूर्गचा पराभव होत असताना नगरावरील हल्ल्याची व महाराणीच्या मृत्यूची बातमी समजली. त्यामुळे महाराजांचे मनोधैर्य खचले. याचा फायदा शत्रू नागदुर्गने घेतला. व बेसावध असताना रात्री तळावर हल्ला केला. यामध्ये महाराज जयवर्धन मारले गेले. त्यामुळे सैन्यात खळबळ माजली. व सैन्याने पलायन केले. याच दरम्यान प्रधान वेददत्त यांनी अश्मक खोऱ्यात गंगेश राजाशी युद्ध करून त्याचा पराभव केला. व ते पुढे महाराजांना मदत करण्यास गेले असता. त्यांना महाराज व महाराणी यांच्या हत्येची बातमी समजली. तेव्हा न डगमगत त्यांनी तेथेच आपल्याला राजा घोषित केले. व आपल्या सैन्याना घेऊन नागदुर्ग वर चालून गेले. तिथे त्यांनी अचानक हल्ला करून नागदुर्गचा पराभव केला. व त्यास ठार मारले. व त्याचे मुंडके कापून उत्तर प्रांतातून मिरवले. व शत्रूवर जरब बसवली. त्यामुळे उत्तर कुंतल प्रदेशाची हद्द सुरक्षित झाली. तरी देखील मध्य कुंतल प्रदेशातील मध्य भागातील राजधानी नगरावर शत्रूच्या सैन्याचा ताबा होता. तेव्हा त्यांनी तो घेण्यापूर्वी अश्मक खोरे व उत्तर कुंतल प्रदेशात नवीन युवक अधिकारी नेमला. व युद्धात सापडलेला शत्रूचा खजिना त्यांनी त्या प्रांताची व्यवस्था लावण्यासाठी खर्च केला. व तेथील नगर तात्पुरती राजधानी नेमून तिथे नवीन मंत्री मंडळ नेमले. व सैन्यानं घेऊन राजधानी व दक्षिण कुंतल प्रदेशाचा भाग जो घनदाट अरण्य असलेला होता. तो अपरांत राज्याचे सैन्य व आचार्य वृषभ यांच्या शिष्यांच्या ताब्यात होता. त्यांनी राजधानी व परिसरातील महाराजांशी एकनिष्ठ रयतेस त्रास देण्यास सुरुवात केली होती. तसेच तेथील नगर नायक ही त्यांचा नातलग असल्याने तेथील सैन्य त्यांना मदत करत होते. व तो भाग निबीड असल्याने सैन्य हालचाल करणे सुलभ नव्हते . व आचार्य वृषभ यांचे शिष्य अत्यंत घातकी सेनानी होते. त्यांच्याशी संघर्ष करणे अवघड होते.
आचार्य वृषभ यांचे शिष्य हे चांगलेच हुशार होते. व वेगवेगळ्या कलात चांगलेच निपून होते. व आपल्या सैन्याची तिथे ते डाळ शिजू देणार नाहीत. व तिथे कार्यवाही करणे अवघड असल्याने इथे शक्तीपेक्षा युकतीचा वापर करायचे ठरवले. यासाठी काटक अशा लोकांची अवश्यकता होती. वेददत्त यांनी मंत्री व गुप्तहेरांशी सल्लामसलत केली. तेव्हा हेर खात्यातील प्रमुख सिद्ध नागार्जुन याने याकामी भिल्ल व पारध्यांची मदत घ्यायचे सुचवले. कारण सदर जातीचे लोक हे काटक व तिरंदाजीसाठी प्रसिद्ध होत्या. त्यांची मदत घेऊन आचार्य वृषभ यांचा आश्रम नष्ट करावा. व अपरांत प्रांतातून येणारी रसद तोडावी. व मग राजधानीची नाकेबंदी करावी. व हल्ला करून जिंकावे असे सुचवले. तेव्हा महाराजांनी सल्लामसलत करून हेरांना आदेश दिला. हेर कामाला लागले. हेरांच्या प्रमुखाने जातीनिशी भिल्ल व पारधी वस्तीवर जाऊन त्याने गुप्त गाठीभेटी घेतल्या. त्यांना महाराज जयवर्धन यांनी केलेल्या उपकाराची व दिलेल्या आश्रयाची जाणीव करून दिली. अनेक भिल्ल व पारधी यासाठी तयार झाले. पण आचार्य वृषभ व त्यांच्या शिष्यांशी लढणे इतके सोपे नव्हते. त्यासाठी योग्य नियोजन हवे होते. यासाठी एक सभा घेतली गेली. अनेक भिल्ल व पारधी सभेला हजर होते तेव्हा महारुद्राने जबाबदारी घ्यायचे ठरवले. त्याने अनेक भिल्ल व पारधी तरुणांना एकत्र जमवले. व त्यांचे संघ तयार करून त्यांना दूर अरण्यात नेऊन त्याकडून युद्ध सराव करून घेतला. तसेच शस्त्रज्ञान ही दिले. व अनेक शूरवीर असे सैनिक त्याने तयार केले. व तो आचार्य वृषभ यांचा बंदोबस्त कसा करायचा यासाठी योजना आखू लागला. त्यांचे हे कौशल्य हेरांनी हेरले. व तो किती हुशार व वीर आहे हे महाराज वेद्दत्त यांना सांगितले. व त्यास सैन्य दलात घ्यावे हे सुचवले. तेव्हा महाराज वेददत्त यांनी त्याने जर ही आखलेली मोहीम यशस्वी केली. तर त्यास सैन्य दलात दाखल करण्यात येईल असे सांगितले.
आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याची इच्छा आता पूर्ण होणार या विचाराने महारुद्र हा वेगवेगळ्या योजना योजू लागला. त्याने गुप्तहेराद्वारे आश्रमाची सर्व खडानखडा माहिती काढली.तो देखील तिथे राहिल्या मुळे त्यास ही थोडीफार माहिती त्या आश्रमाची होती. आश्रम ताब्यात घेऊन तेथील शत्रूचा बंदोबस्त करण्यासाठी महारुद्रने तयारी केली. त्यासाठी योजना आखली. काही निवडक तिरंदाज व हातघाईचे लढवय्ये त्याने घेतले. ते लढाईत तरबेज व सरावलेले होते.
त्याने यासाठी काही पारध्यांना विषारी सर्प गोळा करून त्यापासून विष काढण्यास सांगितले. त्याप्रमाणे काही पारर्ध्यांनी विष काढून कुणालाही कळू न देता आणले. नेमबाजा जवळील धनुष्य व शर जुने झाले होते. त्यांना नवीन धनु व शर बनवण्यासाठी वेत हवे होते. महारुद्र राहत असलेल्या वस्तीशेजारी असणाऱ्या नदीकिनारी उत्कृष्ट वेताची बेटे होती. तेथून वेत आणून त्यापासून धनुष्य बनवायचे ठरले. आपल्या काही साथीदारांना घेऊन तो नदीपार गेला. तेथून त्याने काही बांबू तोडले व आपल्या सहकाऱ्यांना ते बांधून दिले ते घेऊन ते निघाले. त्यांच्या डोक्यावर ओझी देताना महारुद्राला नदीच्या वरील भागातून कोणतरी वेत तोडत असलेला आवाज आला. तो आपल्या सहकाऱ्यांना पुढे पाठवून आवाजाच्या दिशेने निघाला. नदीपात्रातील पाषाण खळगे व पाण्याच्या डोहातून तो पुढे सरकला. थोडे अंतर चालून गेल्यावर त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले तेव्हा त्याला तिथे अंबाला दिसली. ती त्या वेताच्या बेटा मधील काही वेत तोडत होती. तिला अशा भरदुपारी वेताच्या काठ्या काढताना पाहून तो अचंबित झाला. तो हळुवार तिच्या मागे जाऊन उभा राहिला. व ती तेव्हा काठ्या तोडण्यात गुंग होती. तिच्या लक्षात देखील आले नाही की आपल्या मागे महारुद्र उभा आहे ते. तिला ऐकू जाईल अशा प्रकारे तोंडातून आवाज काढला. त्याच्या तोंडातून निघणाऱ्या त्या आवाजाने आंबेचे मन विचलित झाले. ती सावध झाली. आवाजाचा अंदाज घेत तिने कमरेच्या शस्त्रास हात घालून वार करण्यासाठी ती मागे फिरली. व त्यावर वार करणार इतक्यात तो मागे सरला. व तिच्याही लक्षात आले. व ती थांबली.
ती त्याच्याकडे पाहू लागली. तो अत्यंत देखणा होता. त्याचे देखणे पिळदार शरीर अत्यंत प्रेरक होते. तो ही तिच्याकडे पाहू लागला. त्या कृष्णकांती देहातील चाफेकळी नाकाचा व माश्यासारख्या डोळ्यांचा व एका वीरांगनेस शोभेल असा तिचा बांधा अत्यंत लालित्याने भरलेला होता. क्षणभर तो तिच्याकडे पहातच राहिला. तिला पाहून त्याचे हृदय धडधडू लागले. एक प्रणय वेदना जागृत झाली. त्याने स्मितहास्य केले. व तो म्हणाला, “ माझे प्राण घेणार आहेस का? तुझी ती इच्छा असेल तर घे. नाहीतर तूच हे दिले आहेस.”
अंबाला आपले शस्त्र कमरेला लावत, दुसऱ्या हातातील वेत तोडण्याचे शस्त्र खाली करत त्यास म्हणाली, “ या वेळी तू इथे काय करत आहेस. व असे अचानक पाठीमागून येण्याचे प्रयोजन काय?”
अंबाला ही प्रथमच त्याच्या समोर बोलत होती. तिचे बोलणे अत्यंत शुद्ध होते. तिचा आवाज सुमधुर वाटला. तो तिला म्हणाला, “ तू ज्या हेतूने इथे आली आहेस त्याच कामासाठी मी इथे आलो आहे. मलाही काही वेत हवेत.”
अंबाला, “ मला तुझे वागणे संशयास्पद वाटते.”
महारुद्र, “ मी काही आपला पाठलाग करत इथे आलो नाही. तसेच तुला कोणताही त्रास देण्याच्या हेतूने इथे आलो नाही. आज तुला मी प्रथम बोलताना पाहिलेय तू खूप लाघवी आहेस. आपली मैत्री होऊ शकते का?”
त्याचे बोलणे ऐकून ती त्यास म्हणाली, “ या पूर्वी तुम्हाला याचे उत्तर मिळाले आहे. माझ्या सखिने दिलेय ते.”
महारुद्र, “ ते आपले उत्तर नव्हते. त्या दुसऱ्या कुमरिकेने दिले होते. आपल्या डोळ्यात तर वेगळेच दिसत आहे. तसेच त्या आपल्या अंगरक्षक दिसत नाहीत.”
अंबाला, “ मला अंगरक्षकाची गरज नाही. मी स्वतःचे रक्षण स्वतः करू शकते.”
असे बोलून तिने जवळील एक वेल तोडला व त्याच्या साहाय्याने ती तोडलेले वेत बांधू लागली.
महारुद्र, “ मी आपणास मदत करू का?”
अंबाला, “ त्याची काही आवश्यकता नाही.”
क्रमशः पुढे......
