अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथाभाग ९
क्रमशः पुढे चालू.....
महाराजांच्या आज्ञेने प्रधानाच्या प्रासादातील दासीने आपल्या मुलीस राजकुमारी अंबालाच्या सेवेत पाठवले. अंबालाचा प्रासाद म्हणजेच राजमहालात आल्यावर तेथील झगमगाट पाहून ती मुलगी कावरी बावरी झाली. ती तेथील रजावैभव पाहून जरा घाबरली. दासी तिला घेऊन राजकुमारीच्या कक्षात गेली. तिथे जाताना ती विचार करत होती. तिने आजपर्यंत ऐकलेल्या राजे राजवाड्यांच्या कथांमध्ये तेथील शिष्टाचार कडक असतात हे ती जाणून होती. तिला ते आठवले. ती तेथील एका खांबाला उभा राहिली. थोड्या वेळाने अंबाला आतील दालनातून बाहेर आली. त्या मुलीस पाहून तिच्याजवळ आश्चर्य मुद्रेने पहात तिला म्हणाली,
“ तुझ नाव काय आहे?”
मुलगी, “ माझं नाव त्रिशला आहे. मी आपल्या राज्यात आश्रित होऊन आलेल्या व येथे स्थाईक झालेल्या एका पारधी कुटुंबातील मुलगी आहे.”
अंबाला तिला न्याहाळत.ती दिसावयास निम गौर गोधुम वर्ण असणारी नाकी डोळी छान असणारी अशी बावरलेली त्रिशला तिला खूप आवडली. ती तिच्या जवळ गेली. तिचे हात तिने आपल्या हातात घेतले. खूप दिवसांनी तिला एक सखी भेटली होती. अंबाला तिच्याशी मैत्री करून राहू लागली. तिच्या सोबत खेळताना तिला खूप आनंद होई. ती काही दिवस तिच्या सोबत राही. एखादे दिवशी रात्री आपल्या मातेकडे जात असे. नित्य एक जिवलग असे पट्ट ऋणानुबंध त्या दोघींमध्ये निर्माण झाले.
राजकुमारी सोबत राहून ती राज्य शिष्टाचार शिकली होती हळूहळू ती ही त्या महालाची एक भाग झाली होती. त्रिशलेच्या येण्यामुळे राजकुमारी खुश होती. राजकुमारी जस जसी मोठी होईल तस तसे तिच्या शिक्षणासाठी अनेक पारंगत तज्ञ शिक्षक व गुरुवर्य यांची नेमणूक महाराज जयवर्धन यांनी केली. काही कालावधीतच राजकुमारी सर्व कलांमध्ये पारंगत झाली. त्या तलवारबाजी दांडपट्टा, भेदन ,कला, नृत्य, भाला फेक, शस्त्र निर्मिती या सर्व क्षेत्रात प्रवीण झाली. तिच्या सोबत त्रिशला ही तरबेज झाली. अश्व स्वारीत देखील ती तरबेज झाली. ती जसी दिसण्यास सुंदर होती. तशी ती सर्व कलांत निपुण होती. तिच्या सोबत त्रिशला ही. त्या दोघी आता घट्ट मैत्रिणी झाल्या होत्या.
आपल्या मातेस भेटण्यास त्रिशला जात असे. त्यामुळे तिला नगरातून मुक्त फिरता येई. तेथील गंमती जमती तिला अनुभवता येत. त्या ती अंबालेस सांगत असे. राजकुमारीस वाटे की आपण ही राज्यात फिरावे तेथील गंमती जमती पहाव्यात. पण सदैव तिच्या भोवताली पहारा असे. ज्याने तीस बाहेर मुक्त फिरता येत नसे. ती जेव्हा अश्वस्वारी असो वा नगर प्रदक्षिणा ती बाहेर जाताना तिच्या सोबत नेहमी सैनिक असत. व नगरातून जाते वेळी तिच्या समोर येणारा प्रत्येक इसम हा नत मस्तक असे. ज्यामुळे तिला एखादा शुक पिंजऱ्यात अडकावा तसे आपण राजमहालात अडकलो आहोत असे वाटे. अश्व स्वारी ही नगराबाहेर होत असे. त्याने तिथे जनसंपर्क जास्त नसे. तिला ही नगरात जावे वाटे. मोकळे स्वातंत्र हवे होते. तिची ही घुसमट तिने आपल्या सखी जवळ त्रिशलेजवळ व्यक्त केली.त्यावर त्या दोघी काहीतरी उपाय शोधू लागल्या.
…… …… …… …… … … ….
क्रमशः पुढे......
