Showing posts with label अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ८. Show all posts
Showing posts with label अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ८. Show all posts

Tuesday, January 17, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथाभाग ८

 अंबालाा एका राजकुमारी ची प्रेमकथा  भाग ८




क्रमशः पुढे चालू....

राज्यपाट व्यवस्थित चालला होता. एके दिवशी महाराणी अरूणावतीना बरे वाटत नव्हते. त्या मंचकावर पहुडलेल्या होत्या. जवळच दासी वारा घालत होती. प्रभात समया पासून त्यांना पित्त विकाराचा त्रास सुरू झाला. त्यात कोरड्या उलट्या चालू झाल्या. वैद्यांना प्राचारण करण्यात आले. वैद्यांनी हाताची नाडी परीक्षा केली. त्यांना जाणवले की महाराणीना दिवस गेलेत. त्यामुळे त्यांना हा त्रास सुरू झाला होता. दासीला ही बातमी कळताच तिने सर्व प्रासादात ती कळवली. महाराजांना ही बातमी कळताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सर्व मंत्री व लोक महाराणींचे व महाराजांचे अभिनंदन करू लागले. राज्य भर आनंदी वातावरण निर्माण झाले..

दिवस झपझप सरू लागले. महाराणीचे डोहाळे झाले. पुढे ग्रीष्म ऋतू चालू झाला. महाराणीना उष्माज्वराचा त्रास सुरू झाला. त्या वन विहाराला उपवनात गेल्या.

बरोबर काही दासी व अश्वस्वार होते. उपवनात फिरत असताना उपवनास लागून असलेल्या आमराईमध्ये त्या गेल्या. तिथे सर्वत्र गारवा पसरलेला होता. झाडास लागलेल्या आम्र कैऱ्या ग्रीष्म ऋतूच्या महिन्यात मन प्रसन्न करत होत्या. त्या वनातून फिरताना अचानक महाराणीच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्या वनात लोळू लागल्या. दासी त्यांना सावरू लागली. दासी दुष्यलताने सैनिकांना बोलावले. व त्यांनी एका सैनिकास रज्यवैद्याना बोलवणेस सांगितले. अश्वस्वार निरोप घेऊन गेला.

इकडे महाराणी व्याकूळ होऊन लोळू लागल्या. थोड्याच वेळात त्यांनी एका कन्येस जन्म दिला. या सर्व क्रियेत त्यांची शुद्धा हरपली. दुसऱ्या दासीने त्या कन्येला घेतले. त्या कन्येला रेशमी कपड्याने तिने पुसले. इतक्यात तिथे वैद्य आले. त्यांनी उपचार केले. महाराणीना शुद्ध आली. दासी दूष्यलेने रथ आणावयास सांगितला. रथ आणला गेला. वेगाने महाराणीना रथात बसवून महालाकडे नेले गेले.

महाली आल्यावर यथायोग्य उपचार केले गेले. नंतर कन्येला योग्य स्नान घालून नटवले गेले. या सर्व दगदगित महाराणीना विश्रांती हवी होती. त्या त्यांच्या अंतपुरात विश्रांती घेऊ लागल्या.

महाराज जयवर्धन यांना कळल्यावर त्याना खूप आनंद होतो. सर्व राज्यभर आनंद उत्सव साजरा केला गेला. पुढे बाराव्या दिवशी नामकरण विधी पार पडला. बालिकेचा जन्म ग्रीष्म ऋतूत आंबेवणात झाल्यामुळे तिचे नाव अंबाला ठेवले गेले. त्या दिवशी राज्यातील प्रमुख नगरात नगरभोजन ठेवले गेले. अनेक लोकांनी याचा लाभ उचलला. प्रधान पत्नी मात्र नाराज होत्या. कारण त्यांनी आपला पुत्र गमावला होता.

राजकुमारी थाटा माठात वाढू लागली. जयवर्धन यांची ज्येष्ठ कन्या असलेने तिच्या बरोबर खेळण्यास कोणी लहान बालक नव्हते. तिच्यासाठी पुष्कळ खेळणी होती. दासी होत्या. पण त्यामध्ये स्पर्धक वा क्रीडा करावे असे समवयस्क कोणी नव्हते. त्यामुळे राजकुमारी नाराज असे.

एके दिवशी राजकुमारी अंबाला शांतपणे प्रासादात प्रांगणात बसली असता प्रधान वेद दत्त यांचे आगमन झाले. त्यांनी राजकुमारीस शांत बसलेले पाहिले. व ते तिच्या जवळ सानिध्यात गेले. व तिला उदासीनतेचे कारण विचारले.

प्रधान वेददत्त, “ राजकुमारी अंबाला यांच्या चेहऱ्यावरील हास्य कोणी पळवले असावे. जर का कळले तर त्यास शिक्षा करण्याचा मनोदय आहे आमचा.”

राजकुमारी अंबाला, “ आमच्या चेहऱ्यावरील हास्य पळवून घेऊन गेले आपणच. या चार भिंतीच्या विशाल राजमहालात आम्हाला आपण व महाराज यांनी कोंडून ठेवलंय. मजसवे क्रीडा करण्यास देखील कोणी नाही आहे.”

प्रधान वेददत्त, “ काळजी करू नये. मी महाराजांना सांगून एक दासी तुमच्या सेवेत पाठवून देईन.”

अंबाला, “ नकोत आम्हास दास दास्या त्यांचे चेहरे सदा नतमस्तक असतात. आम्हास एखादी सहचारिणी हवी.”

प्रधान वेददत्त, “ ठीक आहे. आम्ही पाहू एखादी सहचारिणी तुमच्यासाठी.”

अंबाला, “ खरंच.”

प्रधान वेददत्त, “ हो खरंच, पण यासाठी एक हास्य तरी गाली यावे.”

अंबाला हसली. प्रधानाना वंदन करून पुन्हा खेळायला दासीसवे गेली.

प्रधान वेददत्त यांनी राजकुमारीची व्यथा महाराजांना सांगितली. त्यावर उपाय म्हणून प्रधानांच्या प्रसादात पारधी समाजातील दासी देविका जिला एक लहान मुलगी होती. तिला राजकुमारीचे सेवेत ठेवण्याची अनुमती मागितली. यावर ते व महाराज यांनी खूप चर्चा केली. शेवटी महाराजांनी दासी पुत्रिस ठेवण्याची अनुमती दिली.

क्रमशः पुढे.....

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...