अंबाला भाग १६
एके दिवशी नगरातून फिरत असताना राजकुमारी अंबालेस एका ठिकाणी दोन गडगंज असे पहिलवानासारखे धिप्पाड देहाची दोन माणसे एका अबला स्त्रीस बडवत वेशा व्यवसाय करणेसाठी घेऊन जात होते. तेव्हा आंबालेने त्यास पाहिले. व जवळून जाणाऱ्या पांथस्थाकडे चौकशी केली असता तो त्यांना म्हणाला, “ सदरहू स्त्री ही एका शेतमजूराची असून त्याने विवाहासाठी काढलेले रीन फेडले नाही. याकारणे रिन देणाऱ्या इसमाने आपले दोन गावगुंड पाठवून दिले. व ते त्याच्या पत्नीस ओढुन घेऊन निघालेत या नगरा बाहेरील गणिका म्हणजे वेश्या वस्तीत त्या स्त्रीस त्यांनी विकले. आहे व त्यासाठी तिला ते घेऊन जात आहेत.
आंबालेस हे समजताच तिला या गोष्टीचा खूप राग आला. व राज्यातील चाललेला गदारोळ व रयतेचे दुःख तिच्या लक्षात आले. सदर स्त्रीस सोडवणे हेच प्रयोजन मनात धरून ती त्यांच्या मागोमाग. निघाली. पेठेतील अनेक लोक तिच्याकडे दयाळू नजरेने पाहत होती. त्या स्त्रीस सोडवणेसाठी ती पाठोपाठ निघाली. तेवढ्यात तिचा हात धरुन त्रिशलेने थांबवले. व ती म्हणाली, “ आपणास त्यांना अडवने शक्य नाही. व आपण इथे जास्त काही हालचाल करू शकत नाही. जर काही आगळीक केली तर असे पितळ उघड होईल. तेव्हा शांतपणे राहणे योग्य.”
अंबाला मात्र त्या स्त्रीस सोडणुकीसाठी धडपडत होती. तिची तीव्र इच्छा झाली होती. तिने त्रिशलाचा हात झटकला व त्या दोन पहिलवाना पाठोपाठ ती जाऊ लागली. ते त्या स्त्रीस मारत झोडत घेऊन चालले होती. त्याने त्या स्त्रीचे अंगावर अनेक जखमा झाल्या होत्या. तिच्या अंगावरील वस्त्रे जागोजागी फाटलेली होती. पेठेच्या शेवटी गवळीवाडा लागत असे. गवळी वाड्यातून पुढे गेल्यावर वेशावस्ती लागत असे. सदर स्त्रीस ते गवळीवाड्याच्या अरुंद गल्लीतून घेऊन निघाले. अंबाला त्या स्त्रीस सोडवू इच्छित होती. पण तिला काय करावे सुचेना. तेव्हा तिने पाहिले की गवळीवाड्यात एका ठिकाणी एक पोळ एका खूंटिस बांधला होता. जो सारखे आपले दावे सुटावे म्हणून तडफडत होता. अंबालेने धाडसाने नजर चुकवून कमरेची कट्यार घेऊन त्या पोळाचा दोर कापला. दावे कापताच तो पोळ त्या अरुंद वाटेने धावू लागला. गवळी वाड्यात जोराचा गलका झाला. तो पोळ थेट त्या स्त्रीला ओढत नेणाऱ्या त्या दोन पहिलवानांच्या दिशेने निघाला. वाटेत येणारे सर्वजन इकडे तिकडे धावू लागले. पाठीमागे चाललेला कल्लोळ पाहून त्या दोन पहिलवानांनी मागे पाहिले. इतक्यात तो पोळ त्यांजवळ आला. त्याला पाहून त्यांनी त्या स्त्रीस सोडले. व ते धावू लागले. त्या पोळाने त्या दोघांना चांगलेच गवळीवाड्याच्या शेवट पर्यंत पळवले. या परिस्थितीचा फायदा त्या स्त्रीने उचलला. व ती धावू लागली. पुढे पेठेत आल्यावर तिला त्रिशलेने थांबवले. व तिचा हात धरून तिने तीस नदीकडे नेले. वाटेत अंबाला त्यांना येऊन भेटली. त्यांनी तिची विचारपूस केली. व तिचे ऋण विचारले. तिने सांगितलेल्या द्रव्या इतके शिक्के तिला दिले. व तिचे कौशल्या विचारले. ती स्त्री सुंदर बांबूच्या वस्तू बनवत होती. तेव्हा तिच्या व्यवसायासाठी तिने आणखी काही सिक्के दिले. व त्रिशलेस सोबत पाठवून ऋण फेडून तिची व्यवस्था लावणेस सांगितले. व ती पुढे अरण्याकडे गेली. त्रिशला ते काम करून अरण्यात अंबाला जिथे थांबली होती तिथे आली. नंतर त्यांनी इकडील तिकडील अंदाज घेतला. व त्या गुप्त मार्गात शिरल्या. व महालात आल्या. अंबाला व त्रिशला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा नगरात त्या मार्गाने वेशभूषा पालटून जात असत
….. ….. ….. ….. …..
क्रमशः पुढे....
