Showing posts with label अंबाला भाग १९. Show all posts
Showing posts with label अंबाला भाग १९. Show all posts

Friday, February 24, 2023

अंबाला भाग १९

 अंबाला भाग १९



क्रमशः पुढे चालू.....

तेव्हा महारुद्र त्यास म्हणाला, “मी देखील त्या व्याघ्रास ठार मारले नाही. त्यास बेशुद्ध केले.”

अशा प्रकारे गप्पा मारत ते बसले. तेवढ्यात महारुद्राच्या मनात विचारांचे काहूर उठल. व त्यास आपण युद्धकलेत तरबेज व्हायचे आहे हे जाणवले. तो त्या साधुस म्हणाला, “ हे महाराज मला आपल्या पंथाकडून शस्त्रज्ञान प्राप्त होईल का?”

साधू, “ हे सर्व आमच्या भिक्षुकांच्या आचार्यांवर अवलंबून आहे.”

तेव्हा भिल्लम म्हणाला, “ आपण तेवढी कृपा करून या मुलास विद्या दान द्यालल का?”

साधू, “ ठीक आहे, मी प्रयत्न करून पाहीन. जर का आचार्यांनी मान्य केले तर ठीक. अन्यथा मी यास परत पाठवून देईन.”

थोड्या वेळाने ते तिथून उठले. व पुढे मार्गस्थ झाले. पुढे काही कोस चालल्यावर तेथे एका तिकटीवर ते आले. भिल्लम व त्याच्या सहकाऱ्यांनी दक्षिण दिशेस प्रयाण केले. व महारुद्र आपल्या माणसांचा व पित्याचा निरोप व आशीर्वाद घेऊन त्या भिक्षुरुपी साधूच्या मागे चालू लागला. ते पुढे पूर्व दिशेस निघाले. मजल दर मजल करत ते पुढे एक टेकडी पार करून पुढे एका ग्रामी आले. तिथे आल्यावर सांज झाली. तिथे एका मंदिरात असणाऱ्या ओवरीत त्यांनी आश्रय घेतला. त्या दिवशी रात्री त्यांनी तेथील लोकांकडून भिक्षा मागून आणलेल्या सिध्यातून अन्न शिजवून घेतले. व ते खाल्ले. त्या रात्री ते ग्रामातील लोकांचा देवविधी कार्यक्रम असलेने तिथे कथा सांगितली जाणार होती. सदर ठिकाणी एक श्वेतवस्त्र परिधान केलेला ब्राह्मण कुमार ज्याच्या हाती वीणा नावाचे वाद्य होते. त्याने जय नामक हिंदू धर्म ग्रंथातील तत्वज्ञान सांगितले. तसेच एकलव्य व गुरू द्रोण यांची कथा पण सांगितली. ते त्यांनी श्रवण केली. दोन प्रहरानंतर समारोप झाला. तदनंतर ते तिथे झोपी गेले. प्रातकाली महारुद्र उठला. व त्याने त्या साधूस उठवले. तदनंतर तेथील जवळील विहिरीवर त्यांनी जाऊन स्नान केले. नंतर मंदिर परिसरातील लोकांच्या घरून आणलेली भिक्षा ग्रहण करून त्यांनी पुढे प्रस्थान केले. आता महारुद्र व त्या साधू मध्ये चांगलीच जवळीक निर्माण झाली होती. ते दोघे पुढे मजल दरमजल करत आश्रमात पोहोचले. तेथील निसर्गरम्य असे वातावरण होते. सुंदर उपयुक्त अशा औषधी व फळा फुलांच्या वनसंपदेचे नटलेले ते ठिकाण पाहून महारुद्रास बरे वाटले. तिथे गेल्यावर महारुद्राचा परिचय त्या साधूने अचार्यांशी करून दिला. व येण्याचे त्याचे प्रयोजन सांगितले. तेव्हा आचार्य महारुद्राकडे पाहत बोलले.

 आचार्य मेघदूत, “ हा काही भिक्षू नाही. सदर विद्या ही फक्त बुध्द धर्मीय साधूस दिली जाते. जे चारिका करत धम्म प्रचारार्थ परदेस गमन करतात. व हा तर एक भिल्ल आहे. जो निरपराध पशू पक्षी यांची शिकार करत फिरतो. हा जर घर संसार त्यागून बुध्द धर्म अनुयायी होत असेल. व धम्म प्रचारार्थ दीक्षा घेत असेल. व त्यानंतर अर्धे तप तो सेवा रूपे इथे घालवत असेल तर त्यास ही विद्या दिली जाऊ शकते.”

आचार्यांचे बोल ऐकूण महारुद्रला खूप वाईट वाटले. कारण संसार त्याग करून म्हणजे आपल्या माता पित्याचा त्याग करणे होय. व तो एकमेव भिल्लम व सिंगनेचा मुलगा होता. त्या कारणे त्याने त्यास विरोध दर्शवला. तेव्हा तो निरोप घेऊन जाऊ लागला. साधू त्याची विनवणी करू लागला. तेव्हा आचार्यांनीनी त्यास विचारले. की तो संसार का त्यागून भिक्कू होत नाही.

 तेव्हा त्याने आपली सर्व परिस्थिती सांगितली. तेव्हा आचार्य मेघदूत यांनी त्याला विद्या ज्ञान देण्याचे ठरवले. मात्र त्याकडून वचन ही घेतले. की सदर विद्या तो कुणा निर्दोष व्यक्तीवर उपयोग करणार नाही. यासंबंधी वचन घेतले. व त्यास राहण्याची परवानगी दिली. अल्पावधीतच महारुद्राने आपल्या वर्तनातून व कार्यातून सर्वांचे मन जिंकले.

क्रमशः पुढे......



अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...