अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३९
क्रमशः पुढे चालू.....
तो जखमी पायाने त्यांच्यापुढे आला. त्याने पाहिले अंबाला त्याच्या समोर शांतपणे अश्रूपूर्ण नजरेने उभा होती. तिची ती आत्मीयता पाहून तो त्याच्या पायातील वेदना विसरला. त्याच्या मनात तिचे स्थान दृढ झाले. त्याचा तो लंगडत्याला पाय पाहून आंबलेचे हृदय जागृत झाले. त्या ह्रुदयात एक प्रेमभाव निर्माण झाला. महारुद्र त्याच्या मित्रांबरोबर महादेव मंदिरात गेला. तेथे त्याने शिवपूजा केली. खूप दिवसांनी तेथे पूजा झाली होती. कारण ते मंदिर गावापासून खूप लांब होते. अंबाला त्रिशलेस म्हणाली की तिने निश्चय केला आहे. की ती महारुद्रासवे लग्न करणार आहे. कारण तिच्यासाठी आपला जीव धोक्यात घालणारा फक्त तोच असेल. व प्रतिकूल वेळी रक्षण ही तोच करेल. ती मंदिरात आली. तिने महारुद्राच्या पायावर डोके ठेवले. व त्याने तिला जिंकले आहे. हे सांगितले. व त्या दोघांनी लग्नाचा निश्चय केला.
त्रिशलेन ही त्यास सांगितले. की ती त्याचा इंद्रावतीशी विवाह लावून देईल. मात्र सहा महिन्यानंतर. व त्या दोघी तिथून निघून गेल्या. महारुद्र अंबालेस जिंकल्याच्या आनंदाने प्रफुल्लित झाला. तो आता नेहमी तिला भेटायला येऊ लागला. पण अंबाला व त्रिशला त्यास कोणतीही माहीती लागू देत नसत. याबाबत त्रिशला ने वचन घेतले होते. हा बदला यशस्वी झाल्यावर अंबाला लग्न करणार होती. अंबाला त्याकडून राज्यातील हालहवाला जाणून घेत असे. पण तो ही सर्व सांगत असे. तसे पाहता त्या दोघींना राजवाडा व राजधानी नगराची खडानखडा माहिती होती. त्यामुळे त्या ही जास्त विचारत नसत. व आपला शेवटचा शत्रू हा महालात आहे व त्याचा आपल्याला बंदोबस्त करून बदला घ्यायचा आहे यासाठी त्या योजना आखू लागल्या. व तयारीला लागल्या.
….. ….. ….. ….. …..
महाराज वेददत्त यांनी आपल्या राज्याची व्यवस्था नीट लावली होती. तरी देखील त्यांनी हेर व्यवस्था नीट केली. व ते हेरांद्वारे बारीक सारीक राज्यातील हालहवाला जाणून घेऊ लागले. ते आपल्या राज्यातील निरनिराळ्या अधिकारी व सैन्यातील अधिकारी यांची ही बित्तंम बातमी ते काढू लागले. त्यांनी महारुद्राची देखील माहिती काढली. त्यामध्ये त्याचेचे प्रेम प्रकरण देखील समजले. एखादा वीर आपल्याला घातक ठरू नये यासाठी ते काळजी घेत. त्याप्रमाणे गुप्त हेरांनी टेहळणी करून सर्व माहिती काढून घेतली. तेव्हा त्यांना महारुद्राच्या पालकांकडून व इतर लोकांकडून समजले की महारुद्र हा भिल्लम व सिंगणेचा पुत्र नसून तो त्याना अरण्यात सापडला होता. तेव्हा महाराज वेददत्त यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. व त्यांनी महारुद्राविषयी जास्त जाणून घ्यायला सुरवात केली.
यासाठी महारुद्राला राज्याच्या उत्तर विभागाची पाहणी करण्यास पाठवले. व महाराज वेददत्त व शामलता स्वतः भेटण्यास भिल्लम व सिंघणा यांच्याकडे गेलीत. तेव्हा त्यांनी महारुद्रास नेमलेल्या नगराची व्यवस्था पाहिली. तेव्हा त्यांना तेथील वैशिष्ट्यपूर्ण नगराची केलेली रचना तसेच तेथील साफसफाई. नगर तट्टावरील कडक पहारा. इतकेच नाही तर नगर सैन्य सराव स्थळं. व इतर व्यवस्था त्यांना अत्यंत आवडली. तेथील कारभार पाहून प्रसन्न मुद्रेने ती दोघे महारुद्राच्या निवास स्थानी गेली. भिल्लम व सिंगणाने यथोचित पाहुणचार केला. तसेच त्यांनी आस्थेने त्यांची चौकशी केली. व हळुवारपणे महारुद्राची माहिती काढली. तेव्हा शेवटी भिल्लम व सिंघणेने सर्व माहिती सांगीतली.
व त्याच्या अंगावरील त्यावेळीची वस्त्रे व ती सोन्याची चैन दाखवली. ती पाहताच महाराणी श्यामलता आनंदित झाली. कारण त्याकडून हरवलेला लहानपणीचा त्यांचा पुत्र रत्नाकर हाच महारुद्र होता. त्यानी खूपवेळ वार्तालाप केला. व शेवटी त्यांनी सिंघणा व भिल्लम यास वचन दिले. की महारुद्र हा त्यांचाच पुत्र राहील. त्यांचेच नाव धारण करेल. व ज्या भिल्ल समाजाने त्यास आपले केले. त्यांचा उद्धार करेल. व आमच्या माघारी या राज्याचा राजा बनेल. असे वचन देवून महाराज व महाराणी राजधानीत आल्या. तिथे आल्यावर त्यांनी दुत पाठवून महारुद्र व त्याच्या सैन्य तुकडीस राजधानीत बोलावून घेतले. राजधानीत आल्यावर फुलांची उधळण व कस्तुरी शिंपून त्याचे स्वागत केले. राजमहालात आल्यावर त्यास उंच आसनावर बसवले. व त्यास सर्व इतिहास सांगितला. व तो आपला वारस असल्याचे सांगितले. त्याचे पिता भिल्लम व माता सिंघणा ही तिथे होती. तो मात्र आपण भिल्लम व सिंघणेचा पुत्र आहोत हेच मानत होता. त्यांच्यापासून दूर रहाणार नाही. शेवटी सर्वांनी त्याची समजूत घातली. तसेच भिल्लम व सिंघणा ही त्यासोबत कायम राहणार असे वचन घेतल्यावर तो शेवटी राजमहालात राहण्यास तयार झाला.
क्रमशः पुढे....
