Showing posts with label अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३२. Show all posts
Showing posts with label अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३२. Show all posts

Wednesday, March 29, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३२

 अंबाला एका राजकुमारी ची 

प्रेमकथा भाग ३२



क्रमशः पुढे चालू......

त्या तिथून निघाल्यावर अर्ध्या वाटेवर आल्या. तेव्हा आंबलेच्या लक्षात आले की आपल्याला दिलेली दुश्यलेने साखळी होती ती आता आपल्या गळ्यात नाही. तेव्हा त्या पुन्हा माघारी तिथे गेल्या. तेव्हा महारुद्राचे साथीदार तिथे सर्व आश्रमातील साहित्य आपल्या ताब्यात घेत होते. अंबाला लपत छपत आचार्यांशी झटापट झालेल्या ठिकाणी आली. तिथे तिने शोध घेतला. पण ती साखळी तिला सापडली नाही

त्यामुळे कोणाला कळायच्या आत त्यांनी तेथून जायचे ठरवले. व त्या निघाल्या. तेथून थेट त्या आपली वस्त्रे लपवलेल्या ठिकाणी गेल्या. तिथे गेल्यावर त्यांनी पोशाख बदलला व पुढे जिथे तलवार लपवली होती तिथे परत आल्या. तिथे अंबालेन आपली वस्त्रे व शस्त्रे लपवली. व त्या महदव्वेस पाठवून दिलेल्या गावी गेल्या. तिथे एक दोन वस्ती टाकून त्या पुन्हा आपल्या राहत्या ग्रामी परतल्या.

वाटेत येताना त्यांना एका वाटसरूकडून आचार्य वृषभ यांच्या आश्रमावर झालेल्या हल्ल्याची बातमी समजली. पण त्यावर जास्त भाष्य न करता त्या आपल्या पारधी वस्तीवर निघून आल्या.

जिथे तिथे आचार्य वृषभ यांच्या आश्रमावरील हल्याची चर्चा सुरू होती.

जो तो म्हणे की आचार्य वृषभ यांच्या आश्रमावर हल्ला करून महाराज वेददत्त यांनी राजधानी वरील हल्ल्याचा बदला घेतला. त्या तिघी आपल्या पारधी वस्तीतील घरी आल्या. व घरात महदव्वेला सोडून रानात अन्न गोळा करण्यास गेल्या. रानात गेल्यावर त्यांनी महदव्वेस आणायला जाताना जी शस्त्रे व वस्त्रे अरण्यातील ढोलीत ठेवली होती. ती जाऊन घेऊन त्या आल्या. व ती आपल्या वस्ती बाहेरील अरण्यात एक विशाल वृक्ष शोधून त्याच्या ढोलीत ठेवली. त्यातील फक्त धनुष्य त्यांनी घेतला व त्या पुन्हा रानातून निघाल्या. अरण्यातील एक वेत तोडून अंबा व त्रिशलाने पुन्हा त्याचे शर बनवले. व त्यांच्या साहाय्याने अनेक फळे त्यांनी काढली. तसेच इतर रानमेवा देखील गोळा केला. व त्या घरी परतल्या.

…. ….. ….. …… …… …… ……

इकडे आचार्य वृषभांना ठार मारल्यावर महारुद्राने आपल्या साथीदारांना अन्य कोणी जिवंत आहे का ते पाहण्यास सांगितले. व काहीना मारलेले शर पुन्हा काढून घेण्यास सांगितले.

त्याच्या सांगण्यानुसार त्याच्या साथीदारांनी ते शर काढून घेतले व महारुद्रच्या पुढ्यात आणले. त्याने त्यातील निराळे शर काढले. ज्यांची घडण निराळी होती. जे त्या कृष्णवस्त्र धारण केलेल्या त्रिशलाने मारले होते. तो आचार्य यांना लागलेला शर त्याने उपसला. तेव्हा त्यास आचार्य वृषभ यांच्या मृत देहाजवळ पडलेली साखळी सापडली. ती त्या वीरांगनेची असल्याची जाणीव त्यास झाली. त्याने ती कोणी पहायच्या आत लपवली. व सर्व पुरावे नष्ट करून तो व त्याचे साथीदार तिथून आपल्या जखमी साथीदारांना घेऊन आपल्या सुरक्षित अरण्यातील युद्ध सराव तळावर आलीत. तेथे त्यांनी विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी जातिनिशी महाराज वेददत्त गुप्तरित्या तिथे आले. त्यांना गुप्त हेरांच्याकरवी आचार्य यांच्या आश्रमावरील हल्ल्याची बातमी समजली होती. त्यांनी त्या ठिकाणी येऊन महारुद्राचे कौतुक केले. व त्यास दक्षिण कुंतल प्रदेशाचा नगर नायक नेमण्याचे ठरवले. त्यासाठी राजधानी शत्रूकडून जिंकून घ्यायची व दक्षिण नगर नायकास हरवून तो प्रदेश जिंकण्याची जबाबदारी महारुद्रावर सोपवली.

…… ……. …… …… …….

क्रमशः पुढे.......

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...