अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३४
क्रमशः पुढे चालू.....
घरी आल्यावर त्रिशलेन पाहिलं की अंबेच्या हाती जखम आहे. तिने त्याविषयी विचारणा केली. तेव्हा शेजारील सिपना ही तिच्यासोबत होती. तिने सर्व हकीकत सांगितली.
अंबेशी ती बोलू लागली. थोड्या वेळाने सीपना निघून गेली. महदव्वा पण झोपली होती. आंबेस शांत पाहून त्रिशलेन विचारलं तेव्हा ती बोलू लागली.
त्रिशला, “ अशी मुखस्तंभ का आहेस.”
अंबाला, “ मी त्या तरुणास पाहिले. आज अगदी जवळून,”
त्रिशला, “ त्यात काय विशेष.”
अंबाला, “ आपणास वाटतो तितका तो शांत नाही. त्याच्या अंगावर मी काही व्रण पाहिले. जे तलवारी व भाल्याच्या वारांचे होते.”
त्रिशला, “ त्यात काय एवढं, असेल एखाद्या मोहिमेवर तो.”
अंबाला, “ आज काल जर एखादा संघर्ष झाला असेल. तो फक्त आचार्य वृषभ यांच्या आश्रमातील. मला वाटते. तो त्या मोहिमेत सामील असेल.”
त्रिशला, “ त्याने आपल्याला पाहिले नाही ना. मग सोड.”
अंबाला, “ पण माझी साखळी हरवली त्याचे काय?”
त्रिशला, “ हे बघ ते विसर कारण शिव ही कोणाचीही देवता आहे. मग कोण ओळखेल. व इथे कोणी इतका श्रीमंत नाही. जो सुवर्ण साखळी घालेल. त्यामुळे आपण सुरक्षित आहोत. इथे चौकशी होणार नाही. व हा विचार करण्यापेक्षा आपण पुढील योजना तडीस नेली पाहिजे. कारण आपणास पुढे नगर नायकाचा बदला घ्यायचा आहे.”
नगर नायकाचा काटा काढण्यासाठी त्या योजना आखणी करू लागल्या. त्यासाठी नगरनायकाचा वाडा व तेथील पहारा पाहाणीसाठी व काही खरेदीसाठी त्यांनी नगरात जायचे ठरवले . घरातील पाणी पिण्यासाठी एक मोठाला माठ हवा होता. तसेच काही जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी त्या पेठेत गेल्या.
पेठेत आल्यावर त्या प्रत्येक देवडी न्याहाळत निघाल्या. तेथून पुढे काही अंतरावरच नगर नायकाचा वाडा होता. तांबड्या मातीने सारवलेल्या घरांच्या रांगेतून त्या पुढे निघाल्या. खरेदी विक्रीचा वार असल्याने पेठेत गर्दी होती. जागोजागी पहारा होता. कारण सदर पेठ ही नगर नायकाच्या ताब्यात होती. व राजधानी सुध्दा. व आचार्य वृषभ यांच्या हत्येमुळे नगरनायक सावध झाला होता. व त्याने पहारा वाढवला होता. नगर नायकाने अपरांत राज्यातून एक सैन्य तुकडी ही मागवली होती. व त्यामुळे एका लष्करी छावणीचे रुप तिजवर आले होते. नगर मोठे होते. पण झाडीमुळे तिथे अलिप्तता तिथे होती. पुढील कडक पहाऱ्यामुळे तिथे जाणे अवघड होते. मात्र मागील बाजूस झाडी होती. त्यातील एक वृक्ष हा त्या महालाच्या गच्चीस लागून होता. तेथे मागील बाजूस एक नाला होता. व त्या परिसरात विषारी सर्पांचा वावर होता. त्यामुळे कोणीही तिकडील बाजूस जात नसे. वाड्याची पाहणी करून त्या पुन्हा पेठेत घुसल्या. व तेथे त्यांनी अफू व काही चामडे एका व्यापाऱ्याला कडून खरेदी केले. तसेच शिवनावळीचे साहित्य ही त्यांनी एका ठिकाणाहून घेतले. व कुंभारवाड्यात जाऊन माठ खरेदी केला. त्यात सर्व आवश्यक साहित्य खरेदी करुन भरले. व त्या परतल्या.
वस्तीवर येण्यापूर्वी त्यांनी ते चामडे व शिवणावळीचे साहित्य बाहेर अरण्यात लपवले. व माठ अन् जीवनावश्यक साहित्य घेऊन त्या वस्तीवर परतल्या. व काही ना काही कारणास्तव त्या तिथे जात. व त्या चामड्यापासून त्यांनी सुंदर असे गुडघ्यापर्यंत पाय सुरक्षित ठेवणारी व हस्त सुरक्षा आवरणे बनवली.
जी अत्यंत जाड होती. त्या रोज रानात जात पण महदव्वा मात्र त्यांना काही बोलत नसे. कारण त्याच तिला सांभाळत होत्या. ती त्यांच्या धाडसाचे कौतुक करीत असे.
त्या दोघी नगरनायकाचा काटा काढण्यासाठी योजना आखनिस लागल्या. योग्य संधीची वाट पाहू लागल्या.
कुंतल प्रदेशात वर्षाराणीचे आगमन दरवर्षी होत असते. तिच्या मध्यावधी काळात पुनर्वसु नक्षत्रात तर जास्तच जोर येत असे. शेतकी कामात अनेक लोक गुंतत असत व रप रप बडवणाऱ्या पर्जण्याच्या दिवसात राज्य नगरातील पहारा कमी होत असे. याच संधीचा फायदा करून घेण्याचे अंबालाने ठरवले. व ती त्रिशलेसवे तयारीला लागली. नगरात जाणारी एक वाट ही नदीच्या मार्गे जात होती. उगम प्रदेशात नदीच्या ती असल्याने ती लांघणे तसे अवघड नव्हते. मात्र तिथे पाण्याचा वेग अती तीव्र असे. दक्षिण कुंतल हे पर्जन्याचे आगर होते. या प्रदेशात वेत बेटे पुष्कळ होती. ती नदी तीरावर अशी वाढली होती की एकप्रकारे वक्र कमानीचे प्रवेशद्वारच बनवत. या दिवसात तांदूळ व नागली यासारखी पिके इथे जास्त घेत असल्याने त्यांची लागन लवकर होई. व लोक घरात राहणेच पसंत करत असत. याच वेळेचा फायदा घ्यायचे अंबाला व त्रिशलेन ठरवले. योजने नुसार त्यांनी एक दिवस निवडला. त्या दिवशी पावसाने अधिकच जोर धरला होता. नदीतील मच्छीचे कालवण त्रिशलेने बनवले. महदव्वेस जेवण वाढले. त्या ही जेवल्या. नंतर त्यांनी एक तांबूल महादव्वेला खायला दिला. त्यामध्ये त्रिशलेन अफू घातली होती. तिच्या गुंगिने ती वृद्धा निद्रिस्त झाली. तिला घराच्या आतील भागात झोपवून शेजारील सीपनेस लक्ष देण्यास सांगून त्या दोघी बाहेर निघाल्या. बाहेर पाऊस पडत असल्याने जाणे अशक्यच एखादा मुसळ आयनात कोसळावा तशा वेगाने कोसळत होता. त्या दोघींनी वेताच्या बारीक कांबट्यांपासून बनवलेले शिरस्त्राण धारण केले होते. त्यांनी ते आपल्या डोक्यावर परिधान केले होते.
त्या वस्तीवरुन निघाल्या. वर्षा ऋतू त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत होते. त्या जवळील अरण्यात गेल्या. तिथे त्यांनी गुप्तरित्या लपवलेली शस्त्रे व आपली चामडी वस्त्रे त्यांनी जिथे ठेवली होती ती घेतली. तेथील एका कपारीत असणाऱ्या गुहेत त्यांनी पेहराव बदलला. व वरती आपला गुप्त पोशाख घातला. थोड भिजल्याने चामड्यास उग्र वास येत होता. पण आता त्या चांगल्याच सरावलेल्या होत्या. पेहराव केल्यानंतर त्या अरण्य वाटेने नगराकडे चालू लागल्या. पुढे नदीकाठी आल्या. नदीला भरपूर पाणी आले होते. नदितिराने त्या उगम बाजूस असणाऱ्या वेत वनात आल्या. तिथेही भरपूर पाणी होते. त्या नदी तुंबात शिरून वेत बेटाजवळ आल्या. आपली शिरस्त्राने बाजूला ठेवली. व डोक्याला दुसरे वस्त्र बांधले. व आपली शस्त्र नीट बांधून त्या बेटावर चढून त्या शेंड्याकडे सरकल्या. नदीच्या पलीकडे असणारी बेटे सुध्दा वाकल्याने त्यांची गुंफण झाली होती. अलीकडील बेटातून वर चढून पलीकडील बेटावर जाऊन त्या नदीपार गेल्या. नदीपार गेल्यावर त्या नगराकडे सरकल्या. तिथे पोहोचेपर्यंत त्याना संध्याकाळ झाली. तिथे गेल्यावर त्यांनी एका जागी आडोसा शोधून आपल्या कडील बंद पिशवीतील सुखामेवा खाल्ला. व पुढे नगराकडे गेल्या. नगर वेशीवर पहारा सौम्य होता. त्यांनी दुसरीकडून नगरात प्रवेश केला. आता रात्र चांगलीच झाली होती. नगर नायकाच्या महाला मागे नाल्यास लागून असलेल्या किर्र झाडीत त्या गेल्या. झाडीच्या गच्च पणामुळे पावसाचा शिडकावा जाणवत नव्हता. तेथे अल्प फलोपहार घेऊन त्या अंधार वाटेने नाल्यात उतरल्या. नाल्यास पाणी आल्याने तेथील सर्प दुसरीकडे गेले होते. व सुरक्षित पेहराव केल्याने त्यांना घाबरण्याची गरज नव्हती. नाला पार करण्यासाठी सुरक्षित जागा त्यांनी हेरली. एका वृक्षाच्या साहाय्याने त्यांनी तो पार केला.
क्रमशः पुढे.....
