Showing posts with label अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३५. Show all posts
Showing posts with label अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३५. Show all posts

Friday, April 7, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३५

 अंबाला एका राजकुमारीची    प्रेमकथा भाग ३५

क्रमशः पुढे चालू......



पार केल्यावर त्या लपत छपत नगराधिकाऱ्याच्या प्रासादाकडे सरकल्या. सर्व प्रासादातील व्यवहार आटोपले होते. नगरनायक झोपी गेले होते. पहारा कमी होता. काही ठिकाणी दिवट्या फक्त तेवत होत्या. अंधारातून त्या दोघी मागील बाजूपासून नगरनायक झोपलेल्या ठिकाणी त्या आल्या. तिथे पहारा देत असलेल्या सैनिकास त्यांनी सावध होऊ न देता ठार केले. त्याचे मुंडके कापून त्यांनी नाल्यात फेकले.

तेथील वृक्षाच्या साहाय्याने गच्चीत त्या उतरल्या. मागील बाजूच्या स्नानगृहातून त्या प्रासादात घुसल्या. व वाटेत येणाऱ्या सर्व खोल्या न्याहाळत चालल्या. प्रत्येक वाटेतील शिपाई सावध न होऊ देता मारत त्या पुढे नगरनायकाच्या मुलाच्या खोलीत गेल्या.तो सावध होऊन प्रतिकार करणार इतक्यात त्यास बेशुद्ध त्यांनी केले. शेवटी त्या दोघी नगरनायकाच्या कक्षात आल्या. त्यांच्या पत्नीस जी पलंगावर झोपली होती तिला बेशुद्ध केले. व नगरनायकास सावध करून त्यांनी उठवले. ती त्यास मारणार इतक्यात तो ओरडला, “ नको नको, मला मारू नका. तुम्हाला हवे तेवढे मी धन देतो. पण मला मारू नका.”

तेवढ्यात अंबालाने त्याच्या पुढे आपली तलवार धरली. ती राजेशाही तलवार पाहताच तो म्हणाला, “महाराज मला माफ करा . मी तुमचा गुन्हेगार आहे. पण मी तर हे तुमच्या पत्राच्या सांगण्याने केले. तेव्हा चुकीस क्षमा असावी. व मज जीवनदान द्यावे.”

त्याचे बरळने ऐकूण अंबालाने त्याच्या कंठावर तलवार ठेवून त्यास विचारले. की त्याने महाराज जयवर्धन यांचा विश्वासघात का केला.

तेव्हा नगरनायक थरथरत, “ पण आपण कोण आहात?”

अंबाला, “ मी महाराज जयवर्धन यांची विश्वासू सहकारी आहे. तू जर सत्य सांगितले तर आपल्यावर कृपा घडेल.”

तो बोलू लागला. त्याच्या बोलण्यातून गुप्त रहस्य उलगडत होते. त्याने एक मोहोर उमटवलेल एक राजपत्र दाखवले. ते तिने ताब्यात घेतले. व नगरनायकाचा तत्काळ शिरच्छेद केला. व त्या दालनातून त्या बाहेर पडल्या. तोपर्यंत प्रसादात कल्लोळ माजला होता. सैन्य सावध झाले होते. त्या दोघी वाटेत येणाऱ्या प्रत्येकास यमसदनी धाडत गच्चीत पोहोचल्या. तेथील वृक्षावरून खाली उतरल्या. व नाल्याकडे सरकल्या. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत नाल्यात घुसल्या. व पोहत पोहत नाल्याच्या खालील बाजूस गेल्या. तेथील आडव्या वृक्षाच्या खोडास पकडुन बाहेर पडल्या. व अंधाऱ्या रात्री नगराबाहेर पडून घनदाट अरण्यात शिरल्या. आता त्यांचे नाल्यातून पोहल्याने सर्व अंग भिजले होते. तेथून त्या आपल्या वस्तीच्या दिशेने अरण्यवाटेने त्या निघाल्या. अंधार्या रात्री काजवी पिशवीच्या प्रकाशात त्या वेगाने निघाल्या. अरण्य मार्ग आता त्यांना बरेच माहीत झाले होते. अरण्य भरपूर चालून त्या पुढे आल्या होत्या. पहाट होऊ लागली होती. या सर्व मोहिमेत अंगाला चांगलेच ओरखडे पडले होते. त्या अरण्य वाटेने नदीतीरी आल्या. व त्यांनी पाहिले नदीस चांगलाच पूर आला होता. त्यांनी पूर्वी प्रमाणे नदी पार केली. व अरण्यात पुन्हा जाऊन आपली वस्त्रे बदलून त्या आपली शिरस्त्राने घेऊन आपल्या वस्तीवर परत आल्या.

…. …… …… ….. ……….

इकडे नगरनायकाचे मुंडके एका बाजूस पडले होते. त्याच्या प्रेतावर त्याची पत्नी शोक करत होती. सैनिक हत्यारांचा शोध घेत होते. पण त्या दिवशी सर्वत्र मुसळधार पाऊस व सर्वत्र आलेले नदी नाल्यांना पाणी व चिखलयुक्त परिसर, तसेच पावसाळी वातावरण व भयंकर अंधारी रात्र हत्यारांना पकडण्यास अडचण निर्माण करत होती. सगळीकडे अफवा पसरत होत्या. काही म्हणत होते महाराज वेद्दत्तांचे हे काम आहे. तर काही आचार्य वृषभ यांच्या शिष्यांचे हे काम असणार. राज्यपदावरील हक्कावरून हत्या झाली असावी. असे बोलत होते. कारण हल्लेखोरांनी कोणतेही धागेदोरे मागे ठेवले नव्हते. त्यांच्याशी लढताना जायबंदी झालेल्या शिपायांना त्यांच्या घोषाधारी पोषाखामुळे त्यांचे चेहरे पाहता आले नाहीत. नगरच्या बाजूला असणाऱ्या लांब लांब वस्त्या व गर्द झाडी यामुळे चौकशी कशी करायची. त्यात नगरातील विरुद्ध असणाऱ्या सर्वांना आधीच तुरुंगात घातले होते. तरी त्यांवर संशय खाणार कसे. शेवटी शांत बसून मार्ग पाहणे चालू झाले.

इकडे अंबाला व त्रिशलाने आपल्या गुप्त ठिकाणी येऊन त्यांनी आपली वस्त्रे बदलून त्या पुन्हा वस्तीवर नजर चुकवून घरात शिरल्या. महदव्वा अजून उठली नव्हती. सिपना सोबत असलेने ती लवकर उठून आपल्या घरी जेवण तयार करणेसाठी गेली होती. महदव्वा गाढ झोपली होती. तिची गुंगी उतरली नव्हती. त्या आपापल्या कामाला लागल्या. त्रिशलेन चूल पेटवली व तिच्यावर घरातील एका रांजनात ठेवलेले सडलेले तांदूळ शिजत टाकले व थंडावलेले अंग त्या शेकत बसल्या. भिजल्याने खूप थंड वाजत होती. तसेच रानातून जाताना अनेक काटेकुटे लागले होते. ते काढत शेकत त्या बसल्या. महदव्वेस जाग आली होती. ती त्यांच्या जवळ आली. तिने अंबालेच्या शरीरावर हात फिरवला व ओरखडे कशाने पडले हे विचारले.

तेव्हा अंबाला म्हणाली, “ काल मासे पकडताना एक वेतकाठी लागून पडले. इतक्यात तिथे सिपना आली. ऐव्हाना तिला त्याविषयी बरीच माहिती झाली होती. पण ती कोणाशी काही सांगत नव्हती. ती महदव्वेस काही जेवण घेऊन आली होती. त्या दोघींना पाहून केव्हा अआलात हे बोलणार इतक्यात त्रिशलाने तीस इशारा केला. तेव्हा तिने आपले बोलणे बदलले.

सीपना, आंबालेकडे पाहत, “काही म्हणेनास वर्षाऋतू मध्ये तुझा काळा रंग उतरतो. व तुझी कांती उजळू लागते बघ.”

तिने असे म्हणताच महदव्वा म्हणाली, “ गप्प सिपने तुझी दृष्ट लागेल तिला.”

तेव्हा अंबेकडे त्रिशलेच लक्ष गेलं. व तिच्या लक्षात आले की अंबालेची काजळी उतरत आहे. तेव्हा तिने लगेच रात्री एकांतात तिला पुन्हा काजळी लावली. व ती पुन्हा कृष्ण वर्णी दिसू लागली.

…. ….. ……. ….. …… …..

क्रमशः पुढे......

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...