अंबाला भाग २८
क्रमशः पुढे चालू...
तिचे अचूक शर संधान पाहून तो चकित झाला. व लगेच तिच्याजवळ येऊन म्हणाला, “मी आपला आभारी आहे. आपण माझे प्राण वाचवले.”
त्रिशला आपले साहित्य सावरत म्हणाली, “ म्हणूनच आम्हाला नदितीरी तुझे कौशल्य दाखवत होतास ना?”
महारुद्र, “ नाही मी आपले आभार मानत होतो.”
त्रिशला, “ झाले मानून , आपण जाऊ शकता.”
महारुद्र, “ आपली मैत्री होऊ शकते का?”
त्रिशला, “ अनोळखी लोकांशी मैत्री होत नाही.”
महारुद्र, अंबालाकडे पाहत “ तरीपण आपले नाव समजले तर बरे होईल.”
त्रिशला, “ आपणास कशाला हवे. आपण आपल्या कामात रहा. भील्लानी पारध्यात मिसळणेचा प्रयत्न करू नये.”
असे बोलून ती चल असे आंबालेस म्हणाली. ती तिच्यामागे चालू लागली. त्या निघाल्या. महारुद्रला कोणतरी आपल्या हृदयावर कट्यार चालवत आहे. असे वाटत होते. त्या निघून गेल्या. तो तिथून नाराज होऊन दुसऱ्या मार्गे नदीवर आला. नंतर तो नदीपार करून आपल्या ग्रामाच्या हद्दीत आला. त्याला त्रिशलेचे वागणे खटकत होते. मात्र त्यास तिच्यापेक्षा त्या कृष्णकुमारीमध्ये रस होता. त्या कन्येचे आकर्षण वाटत होते. त्याने तिला ऐकटी असताना गाठून आपल्या मैत्रीचा प्रस्ताव ठेवायचे ठरवले.
….. ….. ….. ….. …. …..
क्रमशः पुढे....
