अंबाला भाग ३०
क्रमशः पुढे चालू......
वेताच्या काढलेल्या काठ्या बांधताना आंबेच्या हाताचे बोट चुकून टोकास लागले. व तिच्या बोटाला छोटीशी इजा झाली. तिच्या तोंडातून माते असे स्वर निघाले. व तिला राजमातेची आठवण झाली. व डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते रक्ताळलेले बोट तिने तोंडात घातले. ते पाहून महारुद्र पुढे झाला. त्याने तिथे जवळपास रान औषधी शोधली व चटकन तिचा हात हातात घेऊन तिच्या बोटावर बांधली. ती चटकन बाजूस झाली. व उभा राहिली. त्याने ते वेत वेळूने घट्ट बांधले. अंबालाने चटकन तो डोईवर घेतला. व ती चालू लागली. तो तिच्याकडे पाहत राहिला. पाठमोऱ्या तिच्या देहातील लावण्य भर उन्हात ही लकाकत होते. ती दिसेनाशी होईपर्यंत तो तिच्याकडे पहातच राहिला. ती दिसेनाशी झाल्यावर तो मागे वळला. त्याने त्या बेटातील काही काठ्या काढल्या. व तो ही आपल्या वस्तीकडे निघाला. वस्तीवर आल्यावर त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने अनेक धनुष्य व शर तयार केले. व त्या शरांच्या टोकाला त्यांनी विष लावले. व ते गट्टे गुप्त जागी अरण्यात लपवले.
इकडे अंबाला त्या काठ्या घेऊन येऊन तिने घरात बसून तिने अनेक शर तयार केले. व त्याच्या तोंडाला विषारी औषधी लावली. वृध्द महदव्वेस आपल्या बहिणीला भेटायची इच्छा झाली. त्यामुळे त्रिशला तिला सोडण्यासाठी गेली होती. ती तिला सोडून परत आली.
महदव्वा नसल्याचा फायदा अंबेने घ्यायचे ठरवले. आपल्या मातेस ठार मारून आपल्याला परागंदा करणाऱ्यास शिक्षा करण्याचे तिने ठरवले. तिने जवळील पेठेतून त्रिशलेस काही वस्त्रे आणावयास सांगितले. त्याप्रमाणे त्रिशलेने जवळील पेठेत जाऊन काही कृष्णवर्णीय वस्त्रे विकत आणली. व त्या दोघींनी आचार्य वृषभाच्या आश्रमावर हल्ला करण्याचा निश्चय केला. त्याची योजना त्या आखू लागल्या. व त्यांनी योजना आखली.
काही दिवसांनी महदव्वेस परत बहिणीकडून आणण्याचे कारण ग्रामनायकास सांगून त्या तेथून बाहेर पडल्या.
ग्रामातून बाहेर पडल्यावर त्या गावाबाहेरील अरण्यात गेल्या. जिथे त्यांनी गुप्त जागी उंच वृक्षाच्या ढोलीत आपली शस्त्र लपवून ठेवली होती. तिथे गेल्यावर त्यांनी आपला पेहराव बदलला. व आपली शस्त्रे तिने काढली. ज्यामध्ये अंबालेची धारदार तलवार होती. जी तिला तिच्या लहानपणी तिच्या मातेने दिली होती. ती न्याहाळताना तिला आठवले की याच तलवारीच्या बळावर तिने अपरांत देशी त्रिशलाची छेड काढणाऱ्या त्या युवकांचे काम तमाम केले होते. तिने तिची धार पाहिली. व त्या अरण्य वाटेने आचार्य वृषभ यांच्या आश्रमाच्या दिशेने निघाल्या. आता अरण्य म्हणजे त्यांना त्यांचे अंगणच वाटत होते. त्यांनी आपला पेहराव बदलला. व आपली वस्त्रे गुप्त जागी लपवली. व त्या आश्रमाच्या दिशेने निघाल्या. अनेक अरण्यातील ओढे नाले व नदी पार करत त्या परिसरात पोहोचेपर्यंत त्यांना सांज झाली. तिथे जाताना वाटेतील रानफळे व औषधी ज्या त्यांनी जाताना तोडून घेतल्या होत्या. तसेच पन्हाळीचे पाणी जे आपल्या कातडी पिशवीत भरले होते. ते त्यांनी एका उंच वृक्षाखाली बसून निवांत फळे खाल्ली व पाणी पिले. व अंधार होण्याची त्या वाट पाहू लागल्या.
महारुद्र देखील आपल्या सहकाऱ्यांन समवेत आचार्यांवर सुड उगवण्यासाठी निघाला. त्याने आश्रमाच्या उत्तर बाजूने हल्ला करावयाचे ठरवले. त्या बाजूच्या अरण्यात येऊन तो ही रात्र होण्याची वाट पाहत आपल्या साथीदारांसमवेत तिथे दबा धरून बसला. अमावस होऊन गेली होती. थोड्याच वेळात रात्र झाली. त्यामुळे किट्ट काळोख होता. आचार्यांना माहीत होते. की प्रधान वेददत्त आपल्या विरुद्ध कार्यवाही थेट करू शकत नाहीत. व छुपा हल्ला करण्याचे धाडस कोणी करेल. हा त्यांचा भ्रम थोड्याच वेळात दिर होणार होता.
आचार्यांच्या आश्रमात सर्व शिष्य आपला दिनक्रम आटोपून झोपी गेले होते. तसेच मध्यभागी असणाऱ्या आचार्य वृषभ यांच्या कुटिभोवती असणाऱ्या कुटीत राजधानीवर हल्ला करणारे शिष्य धुंद होऊन पडले होते. भोजन झाले होते. व ते विश्रांती घेत झोपी गेले.
रात्रीचा मध्य प्रहर येताच त्या दोघी आश्रमाच्या दक्षिण पूर्व भागाकडून आश्रमाच्या विभागात आल्या. तिथे गोशाळा होती. गाई रवंथ करत होत्या. तेथून त्या लपत छपत तिथून पुढे निघाल्या. त्या बाजूस सहसा कोणी नसे. तिथून शिरकाव करून त्यांनी तिथे असणाऱ्या दोघांना यमसदनी सावध न होऊ देता धाडले. व मागील स्नान गृहाकडून त्या पुढे सरकल्या.
इकडे महारुद्र आपल्या साथीदारांच्या मदतीने पुढील बाजूने आश्रमात आला. आश्रमाच्या प्रवेश दारावरील देवडीत असणाऱ्या दोघांना त्याने संपवले. व आश्रमातील असणारी एक एक कुटी गाठत तेथील दुष्ट शिष्यांना यमसदनी धाडत त्या पुढे निघाल्या. त्रिशला व अंबाला मागील बाजूने शिष्य विश्रांती घेत असलेल्या दालनात आल्या. तिथे आचार्य यांचे शिष्य एका ओळीने झोपले होते. त्यातील बरेचसे चेहरे तेथील छोट्याशा दिव्यांच्या प्रकाशात दिसत होते. जे आंबेने ओळखले. अंबेच्या डोळ्यात निखारे उमटले. डोळ्यासमोर नगरावरील हल्ल्याचा प्रसंग उभा राहिला. नगर तट्टावर शर सोडणारे बरेचजण त्यात होते. जे आंबेने आपल्या मातेच्या निगराणीत पाहिले होते. तिने त्रिशलेस इशारा केला. तिने एक छोटे शस्त्र काढले. ज्यात अनेक सुया सारखी अस्त्रे होती. व तिने अंदाज घेत एका एका स अचूक नेम धरून मारले. ज्याने ते जागीच गतप्राण झाले. तेथून त्या बाहेर पडल्या पुढे एकामागून एक आश्रमाच्या कुटी दालनातील शिष्य टिपत त्या एका ठिकाणी आल्या. त्या दालनातील शिष्यांची शिकार करून बाहेर पडणार इतक्यात त्याना बाहेर हालचाल जाणवली. . त्यांनी कुटी दालनातील गवाक्षातून पाहिले की काही गुप्त पेहराव केलेल्या व्यक्ती शस्त्रे घेऊन आचार्य वृषभ यांच्या कुटिकडे जात आहेत. ते त्रिशलेने पाहिले. तिने अंबालेस संकेत दिला. तिने पाहिले. आता आपली योजना फसते की काय असे वाटले.
क्रमशः पुढे.....
