Showing posts with label अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा. Show all posts
Showing posts with label अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा. Show all posts

Wednesday, January 4, 2023

अंबाला एका राजकुमारीची प्रेमकथा भाग २

 

अंबाला एका राजकुमारीची प्रेमकथा भाग २



क्रमशः पुढे चालू...

महाराणी, “ सेवक आपण आजूबाजूच्या अरण्यातून लाकडे गोळा करावीत व रात्रभर अग्नीची व्यवस्था करा. ज्याने अंधाऱ्या रात्री हिंस्र श्वापदे इकडे आजूबाजूला फिरणार नाहीत.”

सेवक, “ या कामासाठी थोड्याच वेळपूर्वी दोन सेवकांना लावले आहे. त्यांनी भरपूर लाकडे गोळा केली आहेत. ज्यामुळे रात्रभर अग्नी प्रज्वलित करता येईल.” थोड्याच वेळात सर्व सेवक व सैनिक आपल्याला दिलेली जबाबदारी पार पाडतात. सुर्य अस्ताला गेला. सुंदर वाटणारे ते अरण्य रात्रीच्या अंधारात भयावह वाटू लागले होते. रातकिड्यांची किरकिर अत्यंतिक कान किट्ट करीत होती. थोड्या प्रहराने सर्वांचे भोजन झाले. व महाराणी व प्रधानपत्नी विश्रांती घ्यायला बंदिस्त रथात गेल्या. व छोट्या प्रधानपुत्राची जबाबदारी त्यांनी दासीवर सोपवण्यात आली. सैनिक पाळीपाळीने पहारा देवू लागले.

बघता बघता रात्र सरली. अग्नीच्या प्रकाशाने रानटी श्वापदे तळाभोवती फिरकली नाहीत. पहाटेच्या पक्षी कुंजनाने दुश्यला दासी उठली. तिने सैनिकांच्या मदतीने सकाळच्या भोजनाची व्यवस्था तिने केली. थोड्याच वेळात प्रभात झाली. काळोख्या रजणीचे अंथरूण दूर झाले. अरुणोदय झाला. महाराणींना जाग आली. त्यांनी रथाची कवाडे उगडून त्यांनी सूर्य नारायणाचे दर्शन घेतले. व दासीला हाक मारली. दासी दुश्यला हजर झाली.

दुश्यला, “ नमस्कार महाराणी काय सेवा करू.”

महाराणी, “ मी व प्रधानपत्नि स्नान करण्यासाठी नदीकिनारी जात आहोत. तेथे एका दासीस आमची वस्त्रे घेऊन पाठवावे.”

महाराणी व प्रधानपत्नी स्नान करण्यास नदी किनारी गेल्या. त्या नदीच्या सुंदर अशा पाण्याने त्यांनी मुखमार्जन करून आपली वस्त्रे नदीकिनारी ठेवली. व नदीच्या पाण्यात स्नान करून जलक्रीडा करून त्यांनी सूर्याची वंदना केली. व आपले आवरून त्या दोघी बाहेर आल्या. आपली वस्त्रे बदलून त्या तळावर आल्या. तिथे आल्यावर प्रधानपत्नीनी दासी दुश्यलेस एका दासीस प्रधानपुत्र रत्नाकरास स्नान घालण्यास जायला सांगितले .

दासी दुश्यलेने एका दासीस आदेश दिला. ती दासी प्रधानपुत्रास घेऊन दोन सेवाकास घेऊन स्नान घालायला गेली. तिने सेवकांस थोड्या अंतरावर उभे राहायला सांगितले. व ती नदीच्या पात्रात बालकास स्नान घालण्यास उतरली. ती रत्नाकरास स्नान घालत असताना त्याच वेळी नदीच्या पलीकडे काही अंतरावर एक काही दिवसापूर्वी व्यायलेली एक वाघीण पाणी पीत होती. खूप दिवसापासून ती उपाशी होती. तिला शिकार करता आली नव्हती. तसेच ती खूप रोडावली होती. व अश्या स्थितीत तिचे लक्ष पाण्यात उतरलेल्या दासिकडे गेले. व ती सावज टिपण्यासाठी नदीच्या पाण्यात उतरली. भुकेली असलेने झाडीतून लपत छपत तिने अचानक हल्ला चढवला. एका फटक्यात तिने त्या दासीला ठार केले. दासीचा आवाज ऐकूण सेवक धावले. व त्यांनी भाल्याने त्या वाघिणीस जखमी केले. त्यामुळे ती आणखीच क्रोधिस्त झाली. व शेजारी असणाऱ्या बालकास गुंडाळलेल्या वस्त्रासवे घेऊन ती पळाली. पटकन तिने नदी पार केली. व ती निबीड अरण्यात दिसेनाशी झाली.

सेवक तिच्या मागोमाग गेले.

दासीचा आवाज ऐकून महाराणी अरूणावती ओरडल्या, “ सेवक धावा.”

सेवक व सैनिक नदीच्या दिशेने धावले. तिथे त्यांनी पाहिले दासी तिथे मृत पडली होती. व दोन सेवक ही दिसत नव्हते. पाठोपाठ दोन अश्वस्वार वेगाने नदी पार करून गेले.

वाघाच्या हल्ल्याचे वर्तमान समजताच प्रधान पत्नी आक्रोश करू लागल्या. त्यांची ती दयनीय अवस्था पाहून महाराणी अरूणावती त्यांना म्हणाल्या, “ आपण चिंता करू नये. सेवक व अश्वस्वार गेले आहेत. प्रधानपुत्र कुशल असेल. आपण प्रधान पत्नी आहात. असा शोक करणे बरे नव्हे.”

प्रधान पत्नी श्यामलता, “ परंतु मी एक माता पण आहे.”

व त्या मोठ्याने आक्रोश करत विलाप करू लागल्या. या विलापाणे त्यांना भोवळ आली. ते पाहून महाराणीनी दुश्यलेस पाणी आणायला सांगितले. व ते श्यामलतेच्या मुखावर शिंपडले. त्या शुध्दीवर येत व पुन्हा बेशुद्ध होत. इकडे सैनिक खूप दूरवर तसेच आसपास अरण्यात त्या वाघिणीच्या शोध घेऊ लागले. पण त्यांना खूप शोधल्यावर देखील ती सापडली नाही. चांगले पाच प्रहर शोध चालू होता. पण अरण्य घनदाट असलेने व धोक्याचे असलेने रिक्त हाताने ते सैनिक परत आले. थोड्या वेळाने श्यामलता शुध्दीवर आल्या. त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. नंतर सेवकांना बोलावले व मृत दासीवर अंत्य संस्कार करण्यास सांगितले. थोड्या वेळात व्याघ्राच्या मागे

गेलेले सैनिक आले. ते महाराणीपुढे खाल मान घालून उभे होते.

महाराणी, “ अश्वस्वार मिळाले का प्रधानपुत्र.”

अश्वस्वार ,” नाही महाराणी, आम्ही संपूर्ण अरण्यात खूप लांबपर्यंत गेलो. आतील भाग अत्यंत निबीड आहे. तिथे पालापाचोळा असल्याने आम्हाला पाऊलखुणा देखील सापडल्या नाहीत. तसेच रक्ताचे डाग देखील मिळाले नाहीत. तेव्हा आम्हास शोधणे कठीण झाले.”

महाराणी रागाने बोलली, “ दासी बरोबर पहार्यावर असणाऱ्या सैनिकांना बोलवा.”

दासी सोबत त्या वेळी पाहार्यावर असणारे सैनिक थर थर कापत महाराणी समोर आले. ते खाली मान घालून उभे होते.

“ सेवक, आपण आपली पहर्याची व संरक्षणाची जबाबदारी नीट पार पाडली नाहीत.” राणी क्रोधाने बोलली.

सेवक, “ महाराणी आम्ही दासीच्या सांगण्याने शतपवलावर उभा होतो. गर्द झाडी असल्यामुळे व व्याघ्र नदी पलीकडून आल्याने व हा अचानक हल्ला झाल्याने आम्ही तिथे पोहोचोपर्यंत व्याघ्र नदीपार करून गेला होता. प्रधान पुत्र कपड्यात गुंडाळला असल्याने व व्याघ्र माता मोठी असल्याने ती वेगाने नदीपार गेली. आम्ही आटोकाट प्रयत्न केला. पण….”

महाराणी थोड्या नरमाईने

“ झाल ते काही योग्य नव्हे. आपल्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चीन्ह निर्माण होते. आता इथे राहणे धोक्याचे आहे. वेगाने दासीचे दहन करावे. व तिच्या अस्थी भरून आणाव्यात. त्यासाठी दोन अश्वस्वार इथे थांबून हे कार्य करा. व बाकी सर्वांनी प्रस्थानाच्या तयारीस लागा.”

महाराणीनी प्रधानपत्नीस जवळ जाऊन त्यांचे सांत्वन केले.

महाराणी अरूणावती, “ झाले ते वाईटच, पण शोक करून प्रधानपुत्र परत येणार नाहीत. व आता पाच प्रहर आपण त्यांचा शोध घेतला. त्यांच्या आता मिळण्याची शक्यता कमी आहे. तर आपण आपल्या सुरक्षेसाठी पुढील यात्रेस प्रस्थान केले पाहिजे. इथे राहणे धोक्याचे आहे.”

दासी दुश्यला देखील समजावून सांगतले. शेवटी सर्वांच्या अनुरोधाने जड अंतःकरणाने त्या पुढील प्रवासास तयार झाल्या. महाराणी व प्रधनपत्नी बंदिस्त रथात बसल्या. थोड्याच वेळात त्यांनी प्रस्थान केले. काही सैन्य मागे राहिले.दासीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी….

क्रमशः पुढे……



Friday, December 30, 2022

अंबाला राजकुमारीची प्रेमकथा

 अंबाला

एका राजकुमारीची प्रेमकथा

लेखक : निशिकांत हारुगले.

दिर्घ कथा




हिरव्या गर्द झाडीतून निघालेल्या त्या वाटेवर अगदी निर्जन्य अशी शांतता होती. त्या गर्द झाडीतून निघालेली ती वाट सरळ राज्यमार्गाला जाऊन जोडत होती. दंडकारण्यात तून चाललेली ती वाट अत्यंत उंच व सदाहरित वृक्षांनी वेढलेली होती. त्या अरण्यात राहणारे पक्षी अधून मधून किलकिल आवाज करून ती शांतता भंग करत होते. थोड्याच वेळात एक रथ त्या वाटेवरून राज्यमार्गाच्या दिशेने गेला. राज्यमार्गावरून थेट तो सह्यगिरी पर्वत मलेतील एका नगराच्या दिशेनं मार्गस्थ झाला.त्या रथाच्या मधील भाग सुरक्षित बंदिस्त होता. त्याची चक्रे गोल वर्तुळाकार सुंदर अशा वेली- फुलांनी नटलेली होती. त्या आकृत्या रेखीव व शोभित होत्या. रथाला जुंपलेल्या धवल अश्वांचे शोभा वाढवत तालबद्ध संचलन करत होते. अनुकुचीदार भाले घेतलेले शस्त्र सज्ज सैनिकांचे पथक पुढे व मागे मार्ग क्रमन करत होते. त्या सैन्याकडून पाहता कोणाचेही हृदय भीतीने कंपित होईल असे ते वाटत होते. मुख्य रथाच्या मागे आणखी दोन रथ देखील होते. त्या पाठोपाठ काही अश्वस्वार व पायदळातील जवान मार्गक्रमण करीत होते. राज्यमार्गावरून यांच्या एकत्रित पथ संचलनाने धुळीचे लोट उठत होते. व कालांतराने शांत होत चालले होते. राज्य मार्ग अरण्यातून जात असल्याने संपूर्ण तहा दक्षता घेतली होती. या संचलानातील लाभ स्थानाच्या रथात बसून महाराणी अरूणावती व प्रधानपत्नी श्यामलता दुपारचा अल्पोपहार घेऊन वामकुक्षी घेत होत्या. अचानक वळणावर रथ थांबला. त्यामुळे महाराणी अरूणावतींची व श्यामलतांची निद्रा भंग पावली. त्यांनी रथाची कवाडे उघडली. व रथ का थांबला हे शेजारील सैनिकास विचारले.

महाराणी अरूणावती, “ सेवक रथ का थांबला.”

सेवक , “ थांबा महाराणी मी थोड्याच वेळात आलो.”

सेवक पुढे गेला. व लगेच मागे आला.

सेवक, “ महाराणीचा विजय असो. पुढे एक भला मोठा वृक्ष वाटेत पडला आहे. त्यामुळे रथ थांबवला गेला आहे. पुढे जाता येत नाही. ”

महाराणी, “ मग अश्र्वदल पाठवा व वाटेतून बाजूला करा. व मार्ग रिकामा करा.”

सेवक, “ क्षमा असावी महाराणी, हा वृक्ष अत्यंत जून व कैक पटीने अवाढव्य आहे. त्याला जर हटवायचे म्हंटले. तर आपल्या सैनिकांना दोन दिवस लागतील. व इथे जवळपास कोणतेही गाव नाही.”

महाराणी, “ पर्यायी मार्ग आहे का. पाहा.”

महाराणीचा निरोप सैनिक मुख्य नाईकास देतो. तो नाईक लगेच एक अश्वस्वार पाठवतो. अश्वस्वार निघून गेला. त्याला थोड्याच अंतरावर एक पादचारी पांथस्थ भेटला. त्याने राज्यातील नगराकडे जाणारा पर्यायी मार्ग विचारला.

त्या पांथस्थाने सांगितले. “काल रात्री झालेल्या वादळाने तो विशाल वृक्ष कोसळला पुढे जायचे झाले तर एक मार्ग आहे. पण तो निबीड जंगलातून जातो. व त्या मार्गे जाने धोक्याचे आहे. कारण त्या मार्गावर हिंस्र श्वापदे असतात. तोच मार्ग आहे. अन्य मार्ग इथे नाही आहे. कारण हा भाग राज्य सिमेचा असल्याने परचक्रापासून रक्षण करण्यासाठी ही योजना आहे.”

मार्गा विषयी माहिती मिळताच त्या अश्वस्वाराने कृतज्ञतेने नतमस्तक होऊन निरोप घेतला. व तो वेगाने परत आला. मुख्य नायकाला त्याने सर्व वृत्तांत सांगितला.

मुख्य नायक महाराणीकडे आला. व त्यांस

“ महाराणीचा जय असो. अश्वस्वार आलेला आहे. त्याने आणलेल्या माहिती नुसार एका पपादचाऱ्यकडून मिळालेल्या माहितीवरून पर्यायी मार्ग मिळाला आहे. पण तो सुकर नाही. तो अत्यंत घनदाट जंगलातून जात असलेने तेथे हिंस्र श्वापदे आहेत मात्र त्या मार्गाने गेल्यास आपण लवकर आपल्या राज्यातील एका नगरात पोहोचू. तेव्हा महाराणी अरूणावती बोलल्या,

“ आपण शूर राजा जयवर्धनांचे सैन्य आहोत व धाडसी मार्गाने जाताना घाबरता , ते काही नाही. आपण त्या मार्गाने मार्गस्थ होऊया.”

शेवटी महाराणीच्या आज्ञेने सेवकाने रथ मार्ग बदलला. व तो थोडा राजमार्गाने मागे आला. व राज्यमार्गास लागून असलेल्या अनभिज्ञ मार्गावरून तो संपूर्ण महारानींचा लवाजमा घेऊन निघाला. त्या घनदाट झाडीतून जाणाऱ्या त्या मार्गावरून जाणे अत्यंत कठीण होते. कारण त्या मार्गावरील झाडीतून सूर्य किरणे त्या झाडीतून क्वचित दर्शन घडतं होते.

मुख्य अश्वस्वार नायक सैनिकांना म्हणाला, “ हे पाहा आपल्याला जितक्या वेगाने जाता येईल तितका वेग वाढवून हे विपीन पार करावयास हवे. सूर्यास्त होईपर्यंत त्यांनी बरेच अरण्य पार केले होते. ते करताना काही निरागस शाकाहारी प्राणी वगळता त्यांना कोणतेही हिंस्र श्वापद दिसले नाही.

मात्र सह्याचल पर्वताची सुंदर गिरीमाला मन प्रसन्न करत होती. दिवसभर संचलन करून सैन्य खूप थकले होते. त्याना विश्रांती हवी होती. अरण्य संपले. व एका सुदंर नदीचा प्रदेश लागला. त्या नदीकाठी आल्यावर त्यांनी तेथे थांबून महाराणीकडे तो नायक गेला.

“ महरानीचा जय असो. आपण एक निबीड अरण्य पार केले असून.या प्रवासाने अश्व व सैन्य खूप थकले असल्याने श्रमहारासाठी आपण या ठिकाणी मुक्काम केला तर बरे. थोड्याच वेळात सुर्य मावळेल. व अंधाऱ्या रात्री प्रवास करणे या अरण्यातून बरे नाही.”

महाराणी अरूणावती : “ ठीक आहे. आपण रथाचे अश्व सोडून निश्चीत व्हा. व या तटीनी किनारी आमच्या रहाणेची व्यवस्था करा. तसेच सर्व सैन्य व आमच्या सर्व लवाजम्याची भोजनाची व्यवस्था करा. व आमची प्रधान दासी दुश्यला व प्रधानपुत्र रत्नाकर याला उपस्थित करा.”

महाराणीच्या आज्ञेने तो सेवक मागील रथाजवळ आला. व त्याने दासी दुशलेला महाराणीनी बोलावले असल्याचे सांगितले.

दासी दुशला मागील रथात विश्रांती घेत होती. ती आपला आळस टाकत उठली. व बाकी सेवकांना घेऊन तसेच दुसरी दासी जी प्रधान पुत्राला सांभाळत होती. तिच्यासवे महाराणी अरूणावती समोर उपस्थित झाली.महाराणीपुढे नतमस्तक होत.

“ नमस्कार महाराणी, महाराणी आपण मला बोलावलत, काय आज्ञा आहे?”

अरुणावती, “ येथे मुक्काम करायचा ठरला आहे. तरी आमच्या व प्रधानपत्नीच्या राहण्याची व्यवस्था आपण करावी. तसेच प्रधानपुत्र यांना प्रधानपत्नींकडे सोपवावे. त्यांना त्याला पाहण्याची इच्छा झाली आहे.”

जवळील दासीकडील प्रधान पुत्र घेऊन ती प्रधानपत्नी श्यामलता यांकडे ती देते.

“ हा घ्या आपला पुत्र. भारी खोडकर आहे. संपूर्ण प्रवासात अजिबात तो झोपला नाही. खूप दमवले आम्हाला याने.”

व त्यांच्या सेवेला एक दासी ठेवून आपण इतर सेवकांच्या मदतीने महाराणीच्या रहाणेची व्यवस्था ती लावण्यास गेली. थोड्याच वेळात तिने सैनिकांच्या मदतीने पालं तयार केली. तसेच भोजनाची व्यवस्था करण्यासाठी काही सैनिक फळे गोळा करण्यास काही सरपण गोळा करण्यास पाठवली. काही सैनिकांद्वारे तिने पाले बांधून घेतली. एक दोन दास्या व सेवक जेवण बनवण्यास लागले. थोड्या सेवकांनी अश्वावरून जाऊन रानातून लाख व लाकडे आणली. काहींनी अश्वांना चारा पाणी दिला.

विश्रांतीची व्यवस्था झाल्यावर ती महाराणीच्या रथाजवळ आली. व त्यांना

“ महाराणी अरूणावातींचा विजय असो. आपल्या राहण्याची व्यवस्था केली आहे.”

महाराणी व प्रधानपत्नी रथातून उतरल्या. तो पर्यंत एका सेवकाने त्यांना पाणी एका पात्रातून आणून दिले. ते पाणी घेऊन मुख मार्जन करून तसेच त्या स्वच्छ धुवून ते रेशमी वस्त्राने आपले तोंड पुसले आणि त्यांनी सेवकास बोलावले.

क्रमशः पुढे....

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...