अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग १०
क्रमशः पुढे चालू......
जवळच्या नगरात भिल्लम व त्याची पत्नी आपल्या त्या लहान बालकास घेऊन गेली. तेथे गेल्यावर त्यांनी तेथील नगरद्वारावर पहारेकर्यांकडून नगर दंड अधिकारी कुठे राहतात याची चौकशी केली. तदनंतर त्याच्या सांगण्याने ते मुख्य पेठेतून पुढे निघाले. जाताना नगर पेठेतील व्यापारी देवड्या व वास्तू पहात कोपऱ्या कोपर्या वर चौकशी करत ते त्या पेठेतील एका प्रासादरुपी सदना जवळ आलीत. त्या नगरदंड अधिकाऱ्याच्या प्रासादा बाहेर दोन शीपाई होते. त्याकडे त्याने चौकशी केली. तेव्हा त्याने त्याना तिथेच थांबवून आत तो निरोप देवून आला. नंतर थोड्या वेळाने त्यास आत बोलावणे आले. त्या शिपायाने त्याला व त्याच्या बायकोस शेजारील पडवीत नेले. तिथे ओसरीच्या कोपऱ्यात त्याना बसवले. त्याजवळील धनुष्य व भाता तिथे बाजूला ठेवण्यास सांगितला. तदनंतर तो कोठून आला. याबाबत चौकशी केली. तो परराज्यातील आहे का ते तपासले. व नंतर त्यास नगर दंडनायकांकडे नेले गेले.
नगर दंडनायकाने त्याची सखोल चौकशीकही केली. त्याजकडून शिवलिंगाची शपथ घेतली. व राज्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतल्या नंतर त्यास एक मोहोरबंद शिक्का असलेले एक राजपत्र दिले गेले. व राज्यात परराज्यातून आलेली भिल्ल कुटुंबे यांमध्ये राहण्याची अनुमती दिली गेली. त्यापूर्वी त्यांनी त्यास रानातून पाच पक्षी आणण्याची आज्ञा दिली.
भिल्लम खुश झाला. त्याने वाकून नमन केले. व ती दोघं तेथून बाहेर पडली. सिंगणाने विचारले. तेव्हा त्याने आपल्या हातातील राजपत्र तीस दाखवले. व तो त्यांना घेऊन निघाला. त्याने शिपायास आपले भिल्ल बांधव कुठे आहेत ते विचारले. तेव्हा त्या शिपायाने त्यास नगरा बाहेरील उपनगरी अरण्यात ते विसावले असल्याचे सांगितले. व त्यास आपल्यास ही एक पक्षी शिकार करून आणण्यास सांगितले.
त्याने आपले कुटुंब त्या भिल्ल कुटुंबामध्ये घेऊन आला. तिथे आपले कोण ओळखीचे आहे का ते पाहिले, पण तेथे सर्व अनोळखी फक्त एक जात असलेने एकत्र राहत होते. त्यांजवळील एका कुटुंबाच्या जवळ त्याने आपल्या पत्नी व मुलास ठेवले. व तो शिकरिस गेला. त्याने तेथील जंगलात जाऊन काही रान कोंबडे मारले. व त्यातील पाच नगर दंडाधीकार्याना दीले. एक त्या शिपायास. दिला. त्याचा हा उपहार व धाडस पाहून नगर दंडनायक खुश होऊन त्यास आश्वासन दिले. की थोड्याच दिवसात भिल्लम व त्याचे कुटुंबीय यांची राहण्याची व्यवस्था राज्याच्या दक्षिण प्रांती करण्यात येईल. तेथून निरोप घेऊन भिल्लम आपल्या पत्नीस ठेवलेल्या ठिकाणी आला. तिथे असणारी भिल्ल कुटुंबे मिळेल त्या अन्नाच्या सहाय्याने गुजराण करत होती. दोन चार दिवस तिथे राहिल्याने अनेक लोकांशी त्यांची ओळख झाली. ती एकमेकाला मदत करू लागली. पाच दिवसांना एके दिवशी राज्यनायक काही शिपाई घेऊन तिथे आला. तो आपल्या अश्वावरून खाली उतरला. त्याने तेथील विशाल अशा पिंपळ झाडाखाली सर्व भिल्लाना बोलावले.त्या सर्वांना उद्देशून तो बोलला, “ मी या राज्याचा राज्य प्रतिनिधी असून माझी नेमणूक परप्रांतातून आलेल्या प्रजेस सांभाळणे व त्यांना योग्य निवार्याची जागा देणे, यासाठी तसेच त्यांकडून राज्यहीत जोपासणे व त्यांना या राज्यात सामावून घेणे हे आहे. यापूर्वी आलेल्या काही पारधी कुटुंबांना आम्ही आश्रय दिला आहे. ते कुंतल प्रदेशातील दख्खन भागात स्थिर झाले आहेत. त्यांना ज्या तटिनी किनारी रहानेस जागा दिली आहे. तिच्या पलीकडील तीरावर भिल्ल लोकांना वस्तीस जागा द्यायचे ठरवले आहे.
यासाठी तुम्हाला आम्ही तेथे नेणार आहोत. त्या ठिकाणी गेल्यावर तेथे वस्ती निवारे तुमचे तुम्हीच करावयाचे आहेत. यासाठी लागणारे काष्ट सामान व वेत साहित्य तसेच इतर साहित्य आपण तेथील नजीकच्या परिसरातील घ्यायचे आहे. आपण तेथील अरण्यातून सुकलेली लाकडे, फळे, व इतर अरण्य उत्पादने घेऊ शकता. पण तेथील विपीन संस्कृतीस धक्का न लावता. अजस्त्र वृक्ष राजीस धक्का लावणे हा गुन्हा समजला जाईल. सदर ठिकाणाहून जवळील नगराकडे येणारी वाट आपण तयार करायची आहे. तरी उद्या प्रातकाळी आपणास योग्य सिधा दिला जाईल. तो घेऊन तुम्ही आमच्या सैनिकांबरोबर उद्या प्रस्थान करणेचे आहे.”
अशाप्रकारे सूचना देवून तो निघून गेला. सर्व भिल्ल निश्चीत झाले. कारण काही का असेना त्यांना राहावयास आसरा मिळणार होता. व या राज्याचे रहीवासी ते झाली होते.
दुसऱ्या दिवशी राजप्रतिनिधी पुन्हा आला. त्याने काही बैलगाड्या आणल्या होत्या त्यातील धान्य थोडे थोडे भिल्ल लोकांना वाटण्यात आले. नंतर त्या भिल्लांना प्रस्थानाचे आदेश दिले. सर्व भिल्ल कुटुंबे त्या सैनिकांच्या मागोमाग निघू लागले. सदरची नगरी सोडून ते कुंतल देशाच्या वाटेला लागले. वाटेतील मजल दरमजल गावे करत ती सर्व.राजधानी जवळून पुढे दक्षिण कुंतल प्रांताच्या दिशेने निघाली. खूप दूरचा प्रवास असलेने. काही अंतरावर ते लोक विश्रांती तथा वस्ती टाकत ती पुढे चालली. अखेरीस ती सर्व कुंतल प्रदेशातील दख्खन भागात असणाऱ्या निबीड अरण्यात आलीत. तेथील वातावरण एकदम गंभीर स्वरूपाचे होते. उंच उंच असे वृक्ष , त्यावर चढलेल्या अजस्त्र वेली व तेथून वाहणाऱ्या तटिनी व रानात विहारणारी रंगीबेरंगी फुलपाखरं व पक्षी यांनी सजलेली ती अरण्ये ,त्या भागात अनेक प्रकारची वेताची बेटे एक मनमोहक दृश्य बनवत होती. अशा या शोभा आणणाऱ्या परिसरात त्यांना आणण्यात आले. तेथे आल्यावर तो राज्य प्रतीनिधी काही सैन्याच्या देखरेखी खाली त्याना ठेवून निघून गेला.
तिथे आल्यावर सर्व भिल्ल कुटुंबे विचारात पडली. पुढे काय करायचं. तेव्हा भिल्लम पुढे आला . व त्यांना म्हणाला, “ हे पहा महाराज जयवर्धन यांचे कृपेमुळे आपणास निवासाची जागा मिळाली. आपल्यातील पुरुषांनी एकत्र येऊन वस्ती तयार करू. व आपल्यातील काही स्त्रिया जंगलं परिसरातून अन्न गोळा करतील व काही लहान मुलांना सांभाळतील.”
भिल्लमाचे बोलणे सर्व लोकांना पटले. त्यांनी सैनिकांकडून काही कुराडी व इतर हत्यारे मागितली. सैनिकांनी शेजारील नगरातून त्याना आवश्यतेनुसार त्यांनी आणून दिली.
ती हत्यारे मिळताच भिल्लानी नदीपासून सुरक्षित अंतरावर जेथे कमी झाडे होती अशी आपल्या राहण्यास जागा निवडली. नंतर त्यांनी शेजारील भागातील काही वृक्षांच्या फांद्या निवडल्या व त्या तोडल्या तसेच बांबूची बेटे तोडून जाडसर वेळी व दोरखंड वापरून त्यांनी प्रत्येक कुटुंबाला वेगवेगळी त्यांनी घरे तयार केली. घराला कुडाच्या भिंती तयार केल्या. त्या खूप उंच होत्या. त्यानंतर स्त्रियाकडून चिखल पाल्याने लिंपून घेतल्या गेल्या. सर्वांनी एकत्रित केलेल्या या मदतीने थोड्याच दिवसात भिल्लांची सुंदर वस्ती निर्माण झाली. एका सधन ग्रामासारखी ती दिसत होती. त्यांचे कार्य पाहून सैनिक सुद्धा आश्चर्य चकित झाले होते. कारण इतक्या कमी वेळेत इतकी सुंदर वस्ती ती ही इतर गावांसारखी त्यांनी बनवली होती. व आपले कर्तृत्व सिद्ध केले होते. रानातून त्यांच्या स्त्रियांनी बरेच अन्न धान्य ,फळे लाकडे, गोळा केली. प्रत्येक भिल्लास धार्मिक पूजा करून गृह प्रदान केले गेले.
काही दिवसांनी राज्यनायक पाहणी करण्यास आले आता त्याने भिल्लांची वस्ती पाहता आश्चर्य व्यक्त केले. कारण भिल्लांनी खूपच सुंदर घरे बांधली होती. ते पाहून त्यानां स्थीरस्थावर करण्याचे हेतूने त्यांना जमिनी कसण्यास देण्याचे ठरविले. त्याप्रमाणे राज्य दरबारातून परवानगी घेतली. व भिल्लाना नदी किनारी त्या प्रदेशात काही जमिनी मोजून कसण्यास दिल्या. तसेच वस्ती शेजारी काही जमिनी कसण्यास अनुमती राजदरबारातून देण्यात आली. त्यांना लागणारे साहित्य हे तेथील जवळील नगराच्या नगरदंड अधिकारी यांनी दिले. यामुळे काही काळातच भिल्लाची प्रगती झाली. भिल्ल स्त्रिया रानातून औषधी, फळे व इतर वस्तू गोळा करत व शेजारील नगरात विकत. याने तेथील नगराचा व्यापार वाढला. व भिल्लांची प्रगती ही होऊ लागली. भिल्लमाच्य पुढाकाराने आपली प्रगती झाली. म्हणून त्या सर्व भिल्लानी भिल्लमास आपल्या ग्रामाचा ग्रामणी केले.
क्रमशः पुढे.....
