Showing posts with label अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३८. Show all posts
Showing posts with label अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३८. Show all posts

Monday, April 10, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३८

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३८




क्रमशः पुढे चालू.........

महारुद्र, “ मी इतरांचा विचार करत नाही. तुला प्रथम पहिल्यापासून माझ्या अंतर हृदयातून एक अनामिक ओढ निर्माण होते. तुला पहात रहावेसे वाटते. तू जरी कृष्णवर्णी असलीस तरी इतर सुंदर ललना मला तुजसमोर तूच्छ वाटतात. मी तुला कधीही अंतर देणार नाही. वाटत असेल तर तू परीक्षा घे.”

अंबाला, “ मी व आपली परीक्षा , मला वाटते की आपणासारखे पुरुष स्त्रियांना दासिसारखे समजतात. सुरवातीला प्रेम पाशात गुरफटतात. व नंतर मन उबगले की एखादे जीर्ण वस्त्र फेकावे तसे फेकून देतात.”

महारुद्रास ते बोलणे सहन होईना तिचा एकेक शब्द त्याची परीक्षा घेऊ इच्छित होता. कोणतीही परीक्षा असो, मी ती पार करून तुला जिंकेन. पण मी ती परीक्षा जिंकल्यावर तुला मात्र माझ्याशी विवाह करावा लागेल.”

अंबाला, “ ठीक आहे. मी तुझ्यापुढे पाच प्रण ठेवते. ते जिंक व माझ्याशी विवाह करून घेऊन जा. तुला कोणीही अडवणार नाहीत.”

महारुद्र, “ तसे मला अडवणे कोणालाही शक्य नाही. तुझ्या या वस्तीतील नायकासमवेत सारे माझ्या आज्ञेत आहेत.”

अंबाला, “ ते दास असतील, पण माझे माझ्या शरीरावर राज्य आहे. ते मी क्षणात भस्म करून टाकीन.”

तिचे ते बोलणे ऐकून तो परीक्षा देण्यास तयार झाला. पण त्यानेही आपल्या व्यवहारास पुरावा हवा आहे, असे सांगितले

तेव्हा त्रिशलेचे नाव घेतले. की ती याची साक्षीदार असेल.असे सांगितले. तेव्हा त्याने त्याचबरोबर माझेही दोन साथीदार असतील. तेव्हा त्या दोघांनी ठरवले, “ठीक आहे. उद्यापासून या परीक्षेत तू उतर व मला जींक व घेऊन जा. व ती तेथून पाण्याने भरलेली कळशी घेऊन गेली.

….. …..

दुसऱ्या दिवशी ती त्रिशला व सिपनेस घेऊन नदीतीरावर आली. महारुद्र आपल्या दोन साथीदारांना घेऊन तिथे आला. पण तत्पूर्वी तो महादेवाचे दर्शन घेऊन आला. त्या दिवशी अंबाला त्यास घेऊन केळीच्या रानात गेली. कुंतल प्रदेशात असणाऱ्या या रानकेळी या दिवसात कमी पाणीपुरवठा झाल्याने मरत असतात. या दिवसात चैत्र मास असल्याने सुर्य आग ओकत असतो. त्या बनात ती त्याला घेऊन आली. व आपल्या हातातील धारदार शस्त्र देत ती म्हणाली, “या बनात असणाऱ्या पाच रान केळी तू अशा वेधायच्या की त्याचा कापलेला भाग तसाच स्थिर राहिला पाहिजे. व त्या केळीही सुकणार नाहीत.”

महारुद्र, “ विचार करत तो त्या बनातील केळी न्याहाळू लागला. तेव्हा त्यास आठवले की लहानपणी आपण सवंगड्यांशी खेळताना बांबू बेटाचा मधील भाग तसाच ठेवत असत. ज्याने तो बांबू सुकत नसे.थोड्या तंतूवर जिवंत राहत असे. त्याचप्रमाणे त्याने तिच्यासमोर केळींचा छेद धारदार शस्त्राने घेतला. व तिच्या डोळ्यादेखत पाच केळी तिला न कळता छेदल्या. त्याची ही अप्रतिम कला पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. परंतु अंबाला म्हणाली, “चार दिवसांनी कळेल. कोण जिंकले.”

ती सर्व तेथून निघाली चौथ्या दिवशी महारुद्र पहाटे तिथे गेला व त्याने मधले तंतू कापून काढले. ते ही बुंधा न हलता.तोपर्यंत त्या केळी सुकलेल्या नव्हत्या.

नंतर अंबालेसवे त्या बागेचे निरीक्षण केले असता. पूर्ण छेद व केळी हिरव्यागार होत्या. अशा पद्धतीने त्याने प्रथम पण जिंकला.

दुसऱ्या दिवशी तिने दुसरा प्रण त्यापुढे ठेवला. त्यानुसार तिने त्याच्या हाती एक मडके दिले व अरण्यात मध्यभागी असणाऱ्या एका वृक्षावरील पोळ्यातील मध काढायला सांगितला. त्याप्रमाणे त्याने योजना तयार केली. व संध्याकाळी तो त्या वृक्षाजवळ आला. अन् त्याने अरण्यातील पालापाचोळा गोळा केला. व तो पेटवला त्यामधे काही ओला पाला घालून त्याने धूर तयार केला. व एक विशिष्ट प्रकारचे तेल अंगास लावल्याने त्यास त्या पोळ्यातील मध काढणे सोपे झाले. त्याने ते सहज काम केले. कारण तो आपल्या पित्याकडून म्हणजेच भिल्लमाकडून ते शिकला होता. त्याने दुसरा प्रण ही पूर्ण केला. त्यानंतर तिने त्याला एका आम्रवृक्षावरील एक अतिशय उंचावर असणारा कैऱ्यांचा घोस एका बाणात वेधण्यासाठी सांगितला. त्यानंतर त्याला तिने नऊ दुर्मिळ धान्याची नावे सांगितली. ज्याचे बियाणे मिळणे मुश्किल होते. ते आणावयास सांगितले. ते त्याने एका आठवड्याची मुदत घेऊन गोळा केले. व तिच्यासमोर सादर केले. आता शेवटचा पण होता. अंबाला त्याच्या प्रेमात पडलीय. हे त्रिशलेस जाणवले. व ती एकदम सोपे प्रण घालत आहे हे तिला जाणवले. व तिने स्वतः शेवटचा प्रण घालायचे ठरवले. तो प्रत्येक प्रण सोडवत होता. तिच्या प्रत्येक परीक्षेत तो उत्तीर्ण होत होता. त्याच्या या वीरश्रीमुळे अंबाला त्याकडे आकर्षित होत होती व त्याच्या प्रेमात पडली होती. पण यात धोका आहे हे त्रिशला जाणत होती.

अंबा प्रेमाचे नाटक करायचे सोडून त्यात गुंतेल व आपल्या मातेप्रमाने धोका खाईल असे तीस वाटत होते. म्हणून तिने तिसरा प्रण स्वतः सांगायचे ठरवले.

दुसऱ्या दिवशी महारुद्र नदी किनारी आला. अंबाला व त्रिशला देखील तिथे आल्या होत्या. अंबाला बोलण्या आधी त्रिशला म्हणाली, “ तू आतापर्यंत अनेक प्रण जिंकलेस. या पारधी वस्तीच्या पलीकडे एक दुसरी नदी आहे. तिच्या डोहाच्या पलीकडे एक बेलाच झाड आहे. त्याचे बेलपत्रे तू नदीतून पार जाऊनन आणण्याचे व व पारधी वस्ती सीमेवर असणाऱ्या महादेव मंदिरातील पिंडीस वहायचे. व शिवपूजा करायची.”

तिचे हे वाक्य ऐकताच महारुद्राचा सहकारी मित्र त्यास म्हणाला, “ हे काय करतोस मित्रा, एका कृष्णकुमारीसाठी अनमोल जीव धोक्यात घालतोयस. ती नदी सुसरीनी भरलेली आहे. तिथे जाणे म्हणजे मृत्यूच. तुला हीच्यापेक्षा सुंदर मुली मिळतील. अनेक वेड्यापिशा असताना तू कशाला धोका पत्करतोस.”

तेव्हा त्याने अंबालेकडे पाहत हसतच, “तयार आहे.” असे सांगितले. अंबेस काही सुचेनासे झाले. ती म्हणाली, “ नको तो प्रण.बास ती परीक्षा, जो जीव धोक्यात घालेल.”

लगेच त्रिशलेन अंबास खेचले. व व गप्प बसणेस सांगितले.

महारुद्र मात्र त्रिशलेस म्हणाला, “ जर मी हा प्रण जिंकला तर तू याच घडीला माझे व इंद्रावतीचे लग्न लावून देशील.”

त्रिशला, “ मी तुझे व इंद्रावतीचे लग्न लावून देईन, पण सध्या नाही. सध्या तिचा दुर्धर काळ चालू आहे. आज पासून सहा मास झाल्यावर वृंदा एकादशी नंतर तुझ्या गळ्यात इंद्रावती वरमाला घालेल. ही काळ्या दगडावरील रेघ समज”

असे वचन मिळताच तो दुग्ध पाणी असणाऱ्या नदीकाठी त्यांसमवेत आला. त्या सर्वांना सुरक्षित स्थळी उभा करून एक धारदार शस्त्र घेऊन तो नदीत उतरला. व वेगाने पलीकडे गेला. दुपारचा प्रहर असल्याने नदीपात्रातील सुसरी सुस्तावलेल्या होत्या. त्याने पलीकडे जाऊन बिल्वपत्रे तोडली. व एका पिशवीत घेऊन ती कमरेला बांधली. व त्याने पुन्हा अंदाज घेत पाण्यात उडी मारली. आवाजाने मगरी व सुसरी सावध झाल्या. व त्याकडे झेपावल्या. तो वेगाने पलीकडे निघाला. मगरींनी पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो सिताफिने निसटला. व पोहत जाऊन त्याने झेपावून पलीकडील वृक्षाची डहाळी पकडली. मगरीने त्याचा पाय धरला. त्याने एका हाताने डहाळी व दुसऱ्या हाताने त्या शस्त्राने मगरीवर वार केला. मगर जखमी झाली व तिने पाय सोडताच तो वेगाने वृक्षावर चढला. व सुरक्षित अलीकडे उतरला. व त्यांच्या जवळ आला.

क्रमशः पुढे....

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...