अंबाला भाग २१
क्रमशः पुढे चालू......
अचानक महाराज जयवर्धन यांची ग्रहदशा फिरली. व कुंतल देशावर शत्रू चालून आले. राज्याच्या उत्तर सीमेवर असणाऱ्या गंगेश व राजा नागदुर्ग यांनी संगनमताने कुंतल प्रदेशावर हल्ला केला. त्याचा बीमोड करण्यासाठी महाराज जयवर्धन व प्रधान वेददत्त गुंतलेले असताना याच घडीचा फायदा घेण्याचे अपरान्त देशाच्या राजा वैष्णवदत्त याने ठरविले. त्याने दक्षिण कुंतल प्रदेशातील नगर नायक व त्याचा नातलग आचार्य वृषभ यांच्याद्वारे बंडखोरी करून आणली. व आपले काही सैन्य घुसवून त्याने राजधानी वर आक्रमण केले.
अचानक झालेल्या हल्ल्यास तोंड देण्यासाठी महाराणी अरुणावतीनी नगरवाशी सैन्य व काही लोकांच्या सहकार्याने राजधानीच्या संरक्षणाची तयारी चालवली. त्यांनी जातीन नगर तट्टावर पहारा बसवला. याने जोरदार रणकंदन सुरू झाले. आचार्य वृषभ यांचे शिष्य युद्ध कलात तरबेज असल्याने त्यांनी राजधानी नगराची शिबंदी फोडली. व प्रधानाच्या वाड्यावर हल्ला चढवला. व त्यांनी प्रधान पत्नीस कैद केले. व त्यांनी सरळ राजवाड्यावर हल्ला केला. राजवाड्यात जोरदार रणकंदन सुरू झाले. राजवाड्यावर हल्ला होताच महाराणी दासी दुश्यलेस राजकुमारीला राजवाड्याबाहेर सुरक्षित काढण्यास सांगतात. व स्वतः हाती तलवार घेऊन लढू लागतात. राजकुमारीस घेऊन तसेच त्रिशलेस घेऊन दासी दुष्यला गुप्त मार्गे जाऊ लागली. जाताना ती राजकुमारीच्या गळयात आपल्या गळ्यातील पारधी दैवत असलेली चैन घालते. व काळजी घ्या अस सांगत तिला गुप्त मार्गे नेऊ लागली. जाताना अंबाला तिला म्हणाली, “ आपण मागे फिरू लढू शत्रू संगे.”
दुश्यला, “ ते एवढं सोप नाही. व आपले सैन्य देखील युद्धात गुंतले आहेत. व हे आक्रमण राज्याचा नाश करणारे ठरू शकते. इथली काळजी न करता तुम्ही इथून सुखरूप जाणे गरजेचे आहे. इथून तुम्ही बाहेर पडल्यावर वेशांतर करून दक्षिण कुंतल प्रदेशातील अरण्य आश्रयाने राहावे. व नंतर परचक्र नाही शमले तर वेशांतर करून दक्षिण कुंतल प्रदेशातील पारधी वस्तीत माझा भाऊ राहतो त्याचे नाव सुपर्ण आहे. जो मदिरापन करणार आहे. त्यास तुम्ही माझी कन्या आहात हे सांगा. व आश्रय मिळवा. पण सावधगिरीने राहावे. वेळ पडल्यास गौरवर्णीय कांती काजळी लावून झाकावी. सोबत त्रिशला आहेच. पण शत्रू पासून सावध रहा.”
त्या तिघी गुप्त मार्गे तिकडे जाऊ लागल्या. जातेवेळी अरण्य मार्ग बंद असल्याने दुश्यलेने त्या दोघींना पाण्याच्या मार्गे जाण्यास सांगितले. जो नगरा बाहेरील एका तळ्यामध्ये निघत होता. त्या मार्गे त्याना जाण्यास सांगून ती जाताना एक मोहरांची थैली त्यांकडे देत,
“ परमेश्वर कृपा झाली तर पुन्हा भेटू. त्रिश्रला आता अंबालेची काळजी तुलाच घ्यावी लागेल.” असे बोलून तीने त्यांना पाठवले. व शत्रू दिशाभूल करण्यासाठी अरण्य गुप्त मार्ग तिने उघडला. तोपर्यंत राजमहालात रणकंदन झाले. महाराणी अरूणावतींना लढता लढता वीर मरण आले. व शत्रू गुप्त मार्गात शिरले. त्रिशलेने अंबालेचा हात धरला. व तिला खेचत तिने त्या पाण्याच्या गुप्त मार्गे ती घेऊन गेली. दुश्यला गुप्त मार्ग उघडतं असताना शत्रू सैन्य तिथे आले. ती त्यांशी लढू लागली. तेथे पडलेल्या मृत सैन्याच्या भाल्याने तिने पाहता पाहता चार शत्रू सैन्य ठार केले. व ती गुप्त मार्गे बाहेर पडत असताना शत्रू सैन्याचा शर तिला लागला. त्यांच्याशी लढताना तिला वीरमरण आले.
…… …… ….. ….. …. ….. ….. ….
महालातील गुप्त मार्गे पाण्यातून वाट काढत अंबाला व त्रिशला बाहेर एका तलावात पडल्या. तो तलाव नगरा बाहेर एका अरण्याजवळ निघत होता. त्या दोघी थेट अरण्यात शिरल्या. व त्या कुंतल देशाच्या दक्षिण प्रांती असणाऱ्या निबीड अरण्याच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. अरण्यात असणाऱ्या काट्या कट्यातून जात त्या पुढे चालल्या. शत्रू सैन्यास चकवून त्या पुढे निघाल्या. जवळ असणारी मोहोरांची थ्यैली ही पुढील निर्वाह करण्यास मदत करणार होती. ती सांभाळणे व राजकुमारी चे संरक्षण करणे व ती शत्रू सैन्यास दिसणार नाही ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्रिशलेवर होती.
त्या दोघी त्या हिंस्र श्वापदांनी भरलेल्या निबीड अरण्यातून मार्ग काढत वाटेत मिळणारी फळे व कंदमुळे खात त्या दोघी अरण्यातून निघाल्या. पुढे त्यांना एक नदी लागली. जी अरण्यातून वाहत होती. तिच्या झुळझुळ पाण्यात स्नान करून त्यांनी जळ प्राशन केले. अरण्यातून चालून थकल्याने त्यांनी तिथे एका वृक्षाखाली विसावा घेतला. अचानक तिथे एक सर्प हजर झाला. त्यास पाहून त्रिशला घाबरली. अंबाला ने पाहता पाहता त्याचे तलवारीने तुकडे केले. थोडा वेळ विसावून त्या पुढे निघाल्या. अरण्यातून जाताना येणाऱ्या कडू गोड आठवणींचा अनुभव घेत त्या पुढे निघाल्या. अंधाऱ्या रात्री सुरक्षित अशा ठिकाणी निवारा घेत त्या अरण्यातून त्या दोन किशोर वयीन मुली , ज्या वयात लाजत मुरडत साज शृंगार करत फिरावे त्या वयात जीवन प्रवासात तारुण्याच्या उंबरठयावर अरण्य प्रवासात येणारे अनुभव घेत धीट होत चालल्या होत्या. पुढे त्या सह्यगिरी श्रृंखला पार करून अपरांत हद्दीत गेल्या. तिथे पुढे एक मोठे ग्राम लागले. शत्रूच्या हद्दीत व निबीड अरण्यास लागून ते ग्राम असल्याने शत्रू सैन्याचा तिथे राबता नव्हता. ज्याने त्यांस धोखा नव्हता. व शत्रू त्यांना तिथे शोधणे शक्य नव्हते. तेथील ग्रामाबाहेर असणाऱ्या अरण्यातील एका विशाल वृक्षावर आंबलेस थांबवून त्रिशलेने तिच्याकडील थैलितील तिने एक सुवर्ण मोहोर घेतली. ती एक सिक्का असणारी होती. ती तिने अरण्यातील एका दगडावर ठेवून ठेचली. ज्याने तिच्यावरील खूणा अस्पष्ट होतील. तदनंतर ती पुढे त्या विशाल ग्रामाकडे निघाली. तिथे जाताना कुठे शिपाई वा सैन्य नाही याची खात्री करुन ती पुढे उंच जंगल झाडीकडून त्या ग्रामी शिरली. चौकशी करत ती पुढे निघाली. तेथे असणाऱ्या सोनार पेठेची चौकशी तिने केली. तेव्हा तिला एका व्यक्तीने दक्षिणेकडे बोट करत त्या दिशेला असल्याचे सांगितले.
ती पुढे चालत गेली. पुढे कोपऱ्यावर असणाऱ्या पाणक्याशी लाघवी बोलत तिने दागिने बनवणाऱ्या सोनाराची चौकशी करताना तिला त्याकडून समजले की सोनारपेठेत कोणता सोनार व्यवहारी चांगला व वाईट आहे ते.
व ती पुढे निघाली. सोनारपेठेत असणाऱ्या मध्यभागी एका कंजूस सोनारकडे ती मोहोर घेऊन गेली. बाहेरून सोनार देवडीचे तिने निरीक्षण केले. ज्या सोनाराकडे जाऊ नको असे सांगितले होते. त्याकडेच तिने ती मोहोर विक्री करण्याचे ठरवले. व ती त्या सोनार देवडीच्या आत मध्ये गेली. तिथे गेल्यावर…
त्रिशला, “ कोण आहे का?”
देवडीच्या आत कारागिरी करणारा सुवर्णकार बाहेर तिचा आवाज ऐकून आला.
सोनार, “ काय काम आहे. अलंकार हवेत का?”
त्रिशला, “ मी जवळील ग्रामातील एक रहिवाशी असून माझे पिता कुंतल देशात एक कारागीर आहेत. काही महिन्यांपूर्वी ते इथे आले असता त्यांनी मज उदरनिर्वाह करण्यासाठी काही धन दिलेले होते. त्यातील ही एक मोहोर, ती मज विकावयाची आहे. तिचे योग्य मूल्यमापन करावे. अन् योग्य ती रक्कम द्यावी.”
गिऱ्हाईक आल्याचे पाहून त्या सोनाराने तिला आतमध्ये बोलावून घेतले.
क्रमशः पुढे......
