Saturday, January 14, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ६

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ६




अश्मक खोऱ्यातून आलेली पारध्यांची व भिल्लांची कुटुंबे चक्रवातामध्ये सापडली त्यामुळे भरकटून गेली होती. अचानक आलेल्या या संकटामुळे कुंतल प्रदेशात इकडे तिकडे फिरणार्या त्या कुटुंबातील एक भिल्ल जोडपे वाट चुकले. त्या जोडप्यातील पुरुष भिलम व त्याची पत्नी सिंगणा हे दोघेजण त्या घनदाट अरण्यातून भटकत होते. भिल्लं हा धाडसी असल्याने त्याच्या सोबत सिंघणा आपल्याला सुरक्षित समजत होती. अचानक त्यांना एका घाळीच्या कोपऱ्यातून एका जाळीतून त्यांना एका लहान मुलाचे रडणे ऐकू आले. तसे भिलम चौकस नजरेने कानोसा घेत आवाजाच्या दिशेने आपल्या पाठीवरील भात्यातील शर काढून तो धनुष्यावर चढवत पुढे आला. त्याला कड्याशेजारील जाळीत काट्यांमध्ये एक लहान मूल अडकलेलं त्याला दिसले. त्याच्या छाती शेजारील कोपऱ्यात छोटे जखमेच निशाण दिसत होत.

भिल्लमाने पाहिलं की जाळीच्या खाली एका घळीत एक भुकेली वाघीण फिरत होती. ती त्या मुलाचे भोजन करण्याचे इराद्यात होती.त्याने अचूक नेम धरला. व तिर सोडला. तो शर सरसर करत त्या वघिनिसा लागला.त्या शरावरील औषधाने ती वाघीण थोड्याच कालावधीत बेशुद्ध अवस्थेत गेली.

त्या काटेदार जाळीस आपल्या कमरेभोवती असणाऱ्या धारदार शस्त्राने चिरत त्याने त्या लहान मुलास बाहेर काढले. त्याच्या अंगात घुसलेले काटे त्याने काढून टाकले. त्याच्या बरोबर असणारी व सुरक्षित अंतरावर उभी असणारी त्याची पत्नी त्याच्या जवळ आली. लहान मुलाला पाहताच तिला खूप आनंद झाला.

 ती नव्हर्यास म्हणाली, “ही अरण्य देवाची कृपाच म्हणायची. आपल्या निपुत्रिक जीवनात या मुलामुळे नवीन आशा निर्माण झाली. यासारखे भाग्य ते काय?”

असे बोलत तिने त्या मुलास आपल्या जवळ घेत कुरवाळले तिच्याकडे पाहत तिचा नव्हरा भिल्लम म्हणाला, “ मला वाटते हे बालक काही साध्या सुध्या घरातील नाही त्याच्या कानातील कर्णफुले व इतर आभूषण पाहता हा मुलगा कोणी राजघराण्यातील वाटतो.ते बघ तिकडे रेशमी वस्त्र पडले आहे.”

सिंघणा, “ ते काही नाही. मला ते माहीत नाही. या वेळी अशा या जंगलात हे मला महादेवाने दिलेलं वरदान आहे. व मी हे कोणालाही देणार नाही.”

भिल्लम, “ अन् जर का कोणी पकडले व विचारले तर.”

सिंगणेने, त्याच्या अंगावरील वस्त्रे काढून टाकली. त्याच्या गळ्यातील कनक धातूची माळा काढून आपल्या जवळील झोळीतील एक धारदार शस्त्र काढून त्याच्या कानातील कुंडले कापून तिने काढली. व आपल्या जवळ असणाऱ्या कातडी पिशवीतील एक सुती कापड तिने काढले . त्यात बालकास घेतले. व त्याचे अलंकार व वस्त्र गुंडाळून तिने त्या पिशवीत तळाला टाकले. व सुती कपड्यात गुंडाळून त्या बालकाच्या जखमांवरून ती हात फिरवू लागली. हात फिरवताना त्या मुलाची शुद्ध हरपली. व त्यास ग्लानी आली. ते पाहून तत्काळ तेथील पळस पानाचा द्रोण करून जवळील तटिणीचे पाणी घेऊन भिल्लम आला. त्याने त्या पाण्याचे शिंतोडे त्या मुलाच्या अंगावर शिंपडले. त्याला थोडी शुद्ध आली. त्यास थोडे पाणी पाजले. पाणी प्यायल्याने चेतना अंगात जागृत झाली. ते मूल शुध्दीवर आले. व सिंगणेचे मुखाकडे आश्चर्य मुद्रेने पाहू लागले. भिल्लमालादेखील त्याचा मोह झाला.

तो आपल्या पत्नीस म्हणाला, “खरोखर परमेश्वर दयाळू आहे आपल्या जीवनात हे बालक आशेचा किरण म्हणून आले. आपण याचा सांभाळ करूया. व आपलेच बाळ समजून त्याला पुत्राप्रमाने ठेवूया. पण आपल्याला इथून निघाले पाहिजे.

ती वाघीण थोड्याच वेळात सावध होईल. ते दोघे त्या ठिकाणाहून निघाले. थोड सुरक्षित अंतर पार त्यांनी केलं. वाटेतून जाताना भिल्लमाने रानातील काही औषधी गोळा केली. त्याचा रस काढून त्याने त्या बालकास पाजला. थोडा मद देखील पाजला.तसेच काही औषधी गोळा करून त्याचा त्याने अर्क काढला व त्या बालकाच्या जखमेवर लावला. त्याला थोडी हुशारी आली.

त्या हिरव्यागर्द अरण्यातून उंच उंच अशा अजस्त्र झाडं वेलीतून वाट काढत ते दोघे सावधरित्या वाट चालू लागले. वाट चालताना भिल्लम सिंघणेस म्हणाला, “ काही म्हण सिंघणे या वाघिणीचे तावडीतून हा मुलगा कसा वाचला याचेच मज आश्चर्य वाटते.”

सिंघणा, “ कसा म्हणजे त्या वाघिणीने बालकास पकडले तेव्हा तिचा पाठलाग केला असेल कोणीतरी त्यामुळे तिला भोजन करणेस अवसर मिळाला नाही. ती जेव्हा या काटेरी जाळीवरून उडी मारून जाताना हे बालक इथे पडले व या जाळीत अडकले. व या काट्यांमुळे तिला त्यास पकडता आले नाही.”

भिल्लम, “ मला देखील तसेच वाटते.”

सिंघणा, “ पण आपण पुढे काय करायचे की असेच भटकत राहायचे. आपण जातीने भिल्ल असून देखील आपणास या पारध्यांमध्ये राहावे लागते. मला वाटते आपल्या भागातील आणखी भिल्ल कुटुंबे स्थलांतरित होऊन या कुंतल प्रदेशात आली असतील. आपण त्यात मिसळावे व आपल्या भिल्ल लोकांची वस्ती करावी. व स्थिर स्थावर जीवन जगावे.”

भभिल्म, “पण त्यासाठी आपण सीमावर्ती भागातून जंगलवाटेने दक्षिण प्रदेशात जायला हवे. महाराज जयवर्धन यांचे राज्यात आपणास योग्य तो न्याय मिळेल. व राहावयास जागा ही.”

असे बोलत चालत ती दोघे रानातील फळे , कंदमुळे, खात तसेच काही पक्षांची शिकार करत , त्यातून आपला चरितार्थ चालवत बालकास मिळेल तो रस व मद पाजत ते पुढे निघाले होते.

पुढे जाते वेळी वाटेत एक मोठी तटिनी लागली. तिथे एका वृक्षाखाली ते विश्रांती घेत होती, इतक्यात ते लहान बालक रडू लागले. त्याला भूक लागली होती. भिल्लमाने इकडे तिकडे पाहिले. कोण प्राणी दिसतो का? तेव्हा त्याला रानात एक हिरणी दिसली. तिच्या मागे लहान मृगाचे पिल्ले दिसले. त्यावरून ती दुधाळ असल्याचंही समजले. त्याने एक शर धनुष्याला वर चढवला. व तिला मारून बेशुद्ध केले. व जवळील वेलिनी बांधली. थोड्या वेळाने ती शुध्दीवर आली. तिच दुग्ध त्याने महतप्रयासाने काढले. ते काढताना त्या हरिणीने त्यास खूप उपद्रव दिला. तरी त्याने तिचे दूध काढले. व बालकास पाजवले. ते बालक ते दूध पिऊ लागले. ते पाहताना हरिणीने केलेल्या भिलमाच्या अंगावरील जखमा पाहून सिंघणा म्हणाली, “ काय हे दुर्दैव देवा, मज मूल नाही तरी या बालकास पाजण्यापुरती तरी दुग्ध धारा द्यायची होतीस. किती हे कष्ट उपसावे तिचं बोलणे ऐकून भिल्लम म्हणाला, “परमेश्वरास कशाला दोष द्यावा. या जंगलात राहणाऱ्या प्राण्यांपेक्षा किती चांगले जीवन आपणास त्याने दिले आहे. ते काही कमी नाही.”

थोडा वेळ विश्रांती घेऊन ते दोघे त्या बालकास घेऊन मार्गस्थ झाले.पुढे अरण्य संपताच एक छोटीशी वस्ती लागली. वस्ती वरून वाटत होते की ते एक खेडेगाव असावे. ग्रामातील बहुसंख्य घरे मातीची तसेच कुडाची होती. त्यावर रान गवताने शाकारणी केली होती. ग्रामाचे भोवती उंचच उंच बांबूच्या बेटांची कुंपणे होती. कुंपणाऊच आत कुडाची छोटी छोटी घरे सुंदर दिसत होती. सारवलेली अंगणे व भोवती वेगवेगळी फळ, फुल झाडे शोभा देत होती. गावचे वेशीवर पहारा नव्हता. ते त्या ग्रामात आले. तिथली बरीच लोकं कृषी व्यवसाय करत असलेने शेतकीची कामे करणेस ते बाहेर गेले होते. काही छोटी बालके अन् वृद्धांची उपस्थिती जानवत होती. भिल्लम व त्याची पत्नी तिथे जाताच त्याना एका घराच्या बाहेर अंगणात एक वृद्धा तिथे दिसली. त्यांना पाहून तिने त्याना बोलावले. तिच्या अंगावरील वस्त्रे पाहता ती एक शेतकरी महिला वाटत होती. भिल्लम व सिंघणेस पाहून तिने त्यास विचारले, “ आपण कोण आहात. व येथे कशासाठी व कोठून आला आहात.”

तेव्हा भिल्लम म्हणाला, “ आम्ही भिल्ल जमातिची असून आम्ही अश्मक खोर्याचे रहिवासी होतो. परचक्र आल्याने आमची रयत परागंदा झाली. व येथील राज्यात आलोत. परवा झालेल्या चक्रवाताने आमची कुटुंबे विखुरली गेली. आम्ही दोघे व आमचे बालक या रानात भटकून कोठे आसरा मिळतो का ते पहात होतो. इतक्यात ही वस्ती दिसली व येथे आलो आहोत.”

वृद्धा म्हणाली, “ यासाठी तुला जवळील नगर नायकाचे पत्रक घ्यावे लागेल. त्याच्या परवानगीने तुला राजा जयवर्धन यांच्या राज्यात राहण्याची अनुमती मिळेल.”

इतक्यात सिंघणेच्या हातातील रडणारे बालक पाहून ती वृद्धा म्हणाली, “ बाळ रडत आहे. त्यास दुग्धपान का करत नाहीस.”

सिंघणा म्हणाली, “ कसे करू, गेली कित्येक दिवसांपासून अर्धपोटी अवस्थेत आम्ही आहोत. व त्याला आम्ही दुग्ध कुठले देऊ.थोडे फार तांदळाचे दाणे व पीठ मिळाले तर बरे होईल. त्यास थोडी पेज तरी पाजेन.”

वृद्धा, “ठीक आहे. मी पाहते घरात काय आहे ते.”

असे बोलून त्या वृद्धाने त्यांना बाहेरील ओसरीत बसवले. व ती तडक आतमध्ये गेली. व एका पत्रावळीवर देवडीतल्या मडक्यातील पाणीभात घेऊन त्यावर थोडे दही तिने घातले. व ते घेऊन बाहेर आली. व त्या स्त्रीस देत म्हणाली, “ तुम्ही दोघे याचे सेवन करा. मी बालकास थोडे दूध देते.”

 असे बोलून ती आतमध्ये गेली. व देवडीतल्या शिंकाळ्यावरून थोडे दूध तिने एका करवंटीमध्ये काढले. व ते आणून त्या बालकास दिले. ते पाहताना ती सिंघणेस म्हणाली, “बालक खूपच सुंदर आहे. त्याचे काय नामाभिधान ठेविले.”

सिंघणा म्हणाली, “ परागंदा झालेल्या लोकांना ना घर ना दार, कसले आले नामाभिधान. भटकंती करत फिरावे लागले. त्यामुळे पोट भरावे की नाम ठेवावे. हाच प्रश्न आम्हापुढे आहे. त्यामुळे नाम ठेविले नाही.”

वृद्धा म्हणाली, “ या ग्रामामध्ये मध्यभागी एक भट्ट राहतो. येथील लोकांचे दैव व्यवहार तोच पाहतो. त्याकडे जा तो ठेवील योग्य नाम. अन्यथा ज्या बालकाचे नामाभिधान झाले नाही ते बालक भूत योनीत जाते असे येथे समज आहे. तेव्हा आपण त्यास योग्य दक्षिणा द्यावी व हा संस्कार करावा असे मज वाटते.”

त्या वृद्धाचे बोलणे ऐकूण सिंघणा घाबरली. ती व भिल्लम दिलेला आहार घेऊन बालकास दूध पाजून वृद्धेस नमन करून त्या भटाचे घरी निघाली.

फिरत फिरत ती गुरे वाड्या जवळून चौकशी करत वस्तीच्या मध्यभागी असणाऱ्या एका ओसरी वजा घराजवळ आलीत. तेथे आल्यावर भिल्लमा

क्रमशः पुढे......

No comments:

Post a Comment

This is not government websites only private , here deta is a calect to gather our saround see and hearing deta so you check to government websites and agree whit it.

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...