Friday, December 30, 2022

अंबाला राजकुमारीची प्रेमकथा

 अंबाला

एका राजकुमारीची प्रेमकथा

लेखक : निशिकांत हारुगले.

दिर्घ कथा




हिरव्या गर्द झाडीतून निघालेल्या त्या वाटेवर अगदी निर्जन्य अशी शांतता होती. त्या गर्द झाडीतून निघालेली ती वाट सरळ राज्यमार्गाला जाऊन जोडत होती. दंडकारण्यात तून चाललेली ती वाट अत्यंत उंच व सदाहरित वृक्षांनी वेढलेली होती. त्या अरण्यात राहणारे पक्षी अधून मधून किलकिल आवाज करून ती शांतता भंग करत होते. थोड्याच वेळात एक रथ त्या वाटेवरून राज्यमार्गाच्या दिशेने गेला. राज्यमार्गावरून थेट तो सह्यगिरी पर्वत मलेतील एका नगराच्या दिशेनं मार्गस्थ झाला.त्या रथाच्या मधील भाग सुरक्षित बंदिस्त होता. त्याची चक्रे गोल वर्तुळाकार सुंदर अशा वेली- फुलांनी नटलेली होती. त्या आकृत्या रेखीव व शोभित होत्या. रथाला जुंपलेल्या धवल अश्वांचे शोभा वाढवत तालबद्ध संचलन करत होते. अनुकुचीदार भाले घेतलेले शस्त्र सज्ज सैनिकांचे पथक पुढे व मागे मार्ग क्रमन करत होते. त्या सैन्याकडून पाहता कोणाचेही हृदय भीतीने कंपित होईल असे ते वाटत होते. मुख्य रथाच्या मागे आणखी दोन रथ देखील होते. त्या पाठोपाठ काही अश्वस्वार व पायदळातील जवान मार्गक्रमण करीत होते. राज्यमार्गावरून यांच्या एकत्रित पथ संचलनाने धुळीचे लोट उठत होते. व कालांतराने शांत होत चालले होते. राज्य मार्ग अरण्यातून जात असल्याने संपूर्ण तहा दक्षता घेतली होती. या संचलानातील लाभ स्थानाच्या रथात बसून महाराणी अरूणावती व प्रधानपत्नी श्यामलता दुपारचा अल्पोपहार घेऊन वामकुक्षी घेत होत्या. अचानक वळणावर रथ थांबला. त्यामुळे महाराणी अरूणावतींची व श्यामलतांची निद्रा भंग पावली. त्यांनी रथाची कवाडे उघडली. व रथ का थांबला हे शेजारील सैनिकास विचारले.

महाराणी अरूणावती, “ सेवक रथ का थांबला.”

सेवक , “ थांबा महाराणी मी थोड्याच वेळात आलो.”

सेवक पुढे गेला. व लगेच मागे आला.

सेवक, “ महाराणीचा विजय असो. पुढे एक भला मोठा वृक्ष वाटेत पडला आहे. त्यामुळे रथ थांबवला गेला आहे. पुढे जाता येत नाही. ”

महाराणी, “ मग अश्र्वदल पाठवा व वाटेतून बाजूला करा. व मार्ग रिकामा करा.”

सेवक, “ क्षमा असावी महाराणी, हा वृक्ष अत्यंत जून व कैक पटीने अवाढव्य आहे. त्याला जर हटवायचे म्हंटले. तर आपल्या सैनिकांना दोन दिवस लागतील. व इथे जवळपास कोणतेही गाव नाही.”

महाराणी, “ पर्यायी मार्ग आहे का. पाहा.”

महाराणीचा निरोप सैनिक मुख्य नाईकास देतो. तो नाईक लगेच एक अश्वस्वार पाठवतो. अश्वस्वार निघून गेला. त्याला थोड्याच अंतरावर एक पादचारी पांथस्थ भेटला. त्याने राज्यातील नगराकडे जाणारा पर्यायी मार्ग विचारला.

त्या पांथस्थाने सांगितले. “काल रात्री झालेल्या वादळाने तो विशाल वृक्ष कोसळला पुढे जायचे झाले तर एक मार्ग आहे. पण तो निबीड जंगलातून जातो. व त्या मार्गे जाने धोक्याचे आहे. कारण त्या मार्गावर हिंस्र श्वापदे असतात. तोच मार्ग आहे. अन्य मार्ग इथे नाही आहे. कारण हा भाग राज्य सिमेचा असल्याने परचक्रापासून रक्षण करण्यासाठी ही योजना आहे.”

मार्गा विषयी माहिती मिळताच त्या अश्वस्वाराने कृतज्ञतेने नतमस्तक होऊन निरोप घेतला. व तो वेगाने परत आला. मुख्य नायकाला त्याने सर्व वृत्तांत सांगितला.

मुख्य नायक महाराणीकडे आला. व त्यांस

“ महाराणीचा जय असो. अश्वस्वार आलेला आहे. त्याने आणलेल्या माहिती नुसार एका पपादचाऱ्यकडून मिळालेल्या माहितीवरून पर्यायी मार्ग मिळाला आहे. पण तो सुकर नाही. तो अत्यंत घनदाट जंगलातून जात असलेने तेथे हिंस्र श्वापदे आहेत मात्र त्या मार्गाने गेल्यास आपण लवकर आपल्या राज्यातील एका नगरात पोहोचू. तेव्हा महाराणी अरूणावती बोलल्या,

“ आपण शूर राजा जयवर्धनांचे सैन्य आहोत व धाडसी मार्गाने जाताना घाबरता , ते काही नाही. आपण त्या मार्गाने मार्गस्थ होऊया.”

शेवटी महाराणीच्या आज्ञेने सेवकाने रथ मार्ग बदलला. व तो थोडा राजमार्गाने मागे आला. व राज्यमार्गास लागून असलेल्या अनभिज्ञ मार्गावरून तो संपूर्ण महारानींचा लवाजमा घेऊन निघाला. त्या घनदाट झाडीतून जाणाऱ्या त्या मार्गावरून जाणे अत्यंत कठीण होते. कारण त्या मार्गावरील झाडीतून सूर्य किरणे त्या झाडीतून क्वचित दर्शन घडतं होते.

मुख्य अश्वस्वार नायक सैनिकांना म्हणाला, “ हे पाहा आपल्याला जितक्या वेगाने जाता येईल तितका वेग वाढवून हे विपीन पार करावयास हवे. सूर्यास्त होईपर्यंत त्यांनी बरेच अरण्य पार केले होते. ते करताना काही निरागस शाकाहारी प्राणी वगळता त्यांना कोणतेही हिंस्र श्वापद दिसले नाही.

मात्र सह्याचल पर्वताची सुंदर गिरीमाला मन प्रसन्न करत होती. दिवसभर संचलन करून सैन्य खूप थकले होते. त्याना विश्रांती हवी होती. अरण्य संपले. व एका सुदंर नदीचा प्रदेश लागला. त्या नदीकाठी आल्यावर त्यांनी तेथे थांबून महाराणीकडे तो नायक गेला.

“ महरानीचा जय असो. आपण एक निबीड अरण्य पार केले असून.या प्रवासाने अश्व व सैन्य खूप थकले असल्याने श्रमहारासाठी आपण या ठिकाणी मुक्काम केला तर बरे. थोड्याच वेळात सुर्य मावळेल. व अंधाऱ्या रात्री प्रवास करणे या अरण्यातून बरे नाही.”

महाराणी अरूणावती : “ ठीक आहे. आपण रथाचे अश्व सोडून निश्चीत व्हा. व या तटीनी किनारी आमच्या रहाणेची व्यवस्था करा. तसेच सर्व सैन्य व आमच्या सर्व लवाजम्याची भोजनाची व्यवस्था करा. व आमची प्रधान दासी दुश्यला व प्रधानपुत्र रत्नाकर याला उपस्थित करा.”

महाराणीच्या आज्ञेने तो सेवक मागील रथाजवळ आला. व त्याने दासी दुशलेला महाराणीनी बोलावले असल्याचे सांगितले.

दासी दुशला मागील रथात विश्रांती घेत होती. ती आपला आळस टाकत उठली. व बाकी सेवकांना घेऊन तसेच दुसरी दासी जी प्रधान पुत्राला सांभाळत होती. तिच्यासवे महाराणी अरूणावती समोर उपस्थित झाली.महाराणीपुढे नतमस्तक होत.

“ नमस्कार महाराणी, महाराणी आपण मला बोलावलत, काय आज्ञा आहे?”

अरुणावती, “ येथे मुक्काम करायचा ठरला आहे. तरी आमच्या व प्रधानपत्नीच्या राहण्याची व्यवस्था आपण करावी. तसेच प्रधानपुत्र यांना प्रधानपत्नींकडे सोपवावे. त्यांना त्याला पाहण्याची इच्छा झाली आहे.”

जवळील दासीकडील प्रधान पुत्र घेऊन ती प्रधानपत्नी श्यामलता यांकडे ती देते.

“ हा घ्या आपला पुत्र. भारी खोडकर आहे. संपूर्ण प्रवासात अजिबात तो झोपला नाही. खूप दमवले आम्हाला याने.”

व त्यांच्या सेवेला एक दासी ठेवून आपण इतर सेवकांच्या मदतीने महाराणीच्या रहाणेची व्यवस्था ती लावण्यास गेली. थोड्याच वेळात तिने सैनिकांच्या मदतीने पालं तयार केली. तसेच भोजनाची व्यवस्था करण्यासाठी काही सैनिक फळे गोळा करण्यास काही सरपण गोळा करण्यास पाठवली. काही सैनिकांद्वारे तिने पाले बांधून घेतली. एक दोन दास्या व सेवक जेवण बनवण्यास लागले. थोड्या सेवकांनी अश्वावरून जाऊन रानातून लाख व लाकडे आणली. काहींनी अश्वांना चारा पाणी दिला.

विश्रांतीची व्यवस्था झाल्यावर ती महाराणीच्या रथाजवळ आली. व त्यांना

“ महाराणी अरूणावातींचा विजय असो. आपल्या राहण्याची व्यवस्था केली आहे.”

महाराणी व प्रधानपत्नी रथातून उतरल्या. तो पर्यंत एका सेवकाने त्यांना पाणी एका पात्रातून आणून दिले. ते पाणी घेऊन मुख मार्जन करून तसेच त्या स्वच्छ धुवून ते रेशमी वस्त्राने आपले तोंड पुसले आणि त्यांनी सेवकास बोलावले.

क्रमशः पुढे....

No comments:

Post a Comment

This is not government websites only private , here deta is a calect to gather our saround see and hearing deta so you check to government websites and agree whit it.

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...