Wednesday, March 29, 2023

अंबाला भाग ३१

 अंबाला भाग ३१



क्रमशः पुढे चालू.....

ते पंधरा सोळाजन होते. त्यातील चार पाच जण आचार्य वृषभ यांच्या कुटीत शिरले. व त्यांनी आचार्य समजून वार केला. त्यात त्यांची पत्नी जखमी झाली. ती ओरडत उठली. त्यामुळे झोपलेल्या आचार्यांना जाग आली. ते सावध झाले. व त्यांनी तलवार उपसली. व त्या तोंड रुमालाने झाकलेल्या. महारुद्रच्या साथीदारांनी ते दोन हात करू लागले. या सर्व हातघाईत आचार्यांच्या बाजूच्या दालनातील शिष्य जागे झाले. व त्यांना त्यांच्यावरील संकटाची चाहूल लागली. व ते ही शत्र घेऊन बाहेर पडले. तोपर्यंत आचार्यांनी त्यांच्याशी संघर्ष करत त्यांना कुटीबाहेर आणले. कुटी मध्य अंगणात आता चांगलीच हातघाई चालू झाली. त्यातून महारुद्राच्या साथीदारांनी त्यातील काही शिष्य आपल्या बाणांच्या साहाय्याने टिपले. त्यांची हातघाई पाहून त्रिशला आंबेस म्हणाली, “चल माघारी.”

तेव्हा अंबा म्हणाली, “आता चालून आलेली ही संधी पुन्हा मिळनार नाही. शत्रूचा शत्रू आपला मित्र. व मला वाटते इथे आपली जास्त गरज आहे. कारण या सराईत आचार्य शिष्यांशी सामना करणे अवघड आहे. व हे योध्दे जास्त वेळ टिक मारणार नाहीत.

त्या दोघींना तो महारुद्र व त्याचे साथीदार आहेत हे माहीत नव्हते. कारण त्या सर्वांनी तोंडावर रुमाल बांधले होते. ते अत्यंत त्वेषाने लढत होते. महारुद्र तर जीवाचे रान करून त्यांच्याशी मुकाबला करत होता. त्याचे हातघाई केलेले साथीदार जखमी होत होते. थकत होते. एकटा महारुद्र किती वेळ त्यासमोर टिकेल. महारुद्रचे जखमी साथीदार मागे हटत होते. तसेच त्यांची आयुधे ही कमकुवत होती. सराईत युद्ध करणाऱ्या आचार्यांच्या शिष्यांपुढे त्यांचा निभाव लागणे कठीण होते. भाले व वेतकाठीने किती वेळ ते लढणार. तरी देखील ते प्रतिकार करत होते.

 महारुद्राच्या साथीदारांनी मारलेले बाण अचार्यांचे शिष्य चुकवत पुढे सरकत होते.

लढता लढता आचार्य वृषभ महारुद्राला म्हणाले, “ कोण आहेस तू? इथे येण्याचे प्रयोजन सांग.”

महारुद्र, “ मी तुमचा काळ आहे. बदला घेण्यासाठी आलोय.”

आचार्य वृषभ, “ तुला माझी ताकद माहीत आहे का? महाराज जयवर्धनांच्या सैन्याचा जिथे निभाव लागला नाही तिथे तू किती वेळ टिकशील. शरण ये.”

महारुद्र, “ महराज जयवर्धनांचे सैन्य. म्हणजे मी नव्हे. ज्यांचा तू विश्वासघात केलास. तुझ्या बऱ्याच दुष्ट शिष्यांना मी यमसदनी धाडले. आता तुला फक्त त्यांच्याकडे पाठवायचे आहे.”

आचार्य वृषभ, “ तू व तुझे साथीदार माझ्यापुढे जास्तवेळ टिकणार नाहीत.”

महारुद्र हरतर्हेने त्यांच्याशी मुकाबला करत होता. पण थोड्याच वेळात त्याची तलवार तुटली. व आचार्य वृषभ त्यास मारणार इतक्यात अंबलाने इशारा केला. त्रिशलाने एक बाण सोडला. तो आचार्यांच्या हातावर लागला. त्यांचे लक्ष तिकडे गेले. तेव्हा त्यांना घोषाधारी तोंड बंधिस्त असे कृष्णवर्णी पेहराव केलेले दोन योद्धे दिसले.

इतक्यात बाण सोडत त्रिशलेने आचार्यांचे अनेक शिष्य टिपले. तिचे अचूक शर संधान पाहून आचार्य चिडले. इतक्यात अंबालाने आपली तलवार काढली. व चपळता दाखवून आचार्य वृषभ यांच्या एका शिष्यास ठार करून त्याचे मुंडके छाटले. ते एखाद्या चेंडू सारखे आचार्यांच्या पायात पडले. इतक्यात महारुद्र वेगाने बाजूला झाला. व त्या घोषाधारी वीर योद्ध्यांकडे पाहू लागला.

अचार्य, “ ए नेभळट विरा असे बेसावध विरांना मारताना तुला लाज वाटत नाही. असे मागून वार तरस करतात शूरवीर नाही.”

अंबाला, “ मला नेभळट व तरस म्हणणारे तुम्ही कुठल्या अंगाने सिंह शोभता. ज्यावेळी तुम्ही महाराज जयवर्धन यांच्या माघारी नगरावर हल्ला केला. व राजमाता अरूणावती यांचा घात केला त्यावरून तर तुम्ही लबाड लांडग्या सारे आहात. हे सिद्धच केलाय.”

आचार्य, “ तुझा व त्याचा काय संबंध.”

अंबाला, “ संबंध माझी तलवारच सांगेल.”

आचार्य, “आवाजावरून तर तू एक स्त्री वाटतेस.”

अंबाला, “ माझ्या आवाजावर व शरीरावर जाऊ नका. मी पण पहातेच तुम्ही किती शूर आहात ते. वाचवा स्वतला.”

असे म्हणत ती आचार्य वृषभ यांच्या अंगावर धाऊन गेली. व त्यांच्याशी लढायला लागली. आत्यंतिक विजेच्या वेगाने तिचे अंग हलत होते. आचार्यांचे उरलेले शिष्य टिपत ती लढत होती. त्रिशाला ने एक हुकमी स्त्री शर काढला. जो अत्यंत घातक होता. व तिने अचार्यांवर नेम धरला. अंबाला आचार्यांच्या शिष्यांना यमसदनी धाडून अचार्यांशी दोन हात करू लागली. तिची हालचाल पाहून ती एक वीरांगना आहे हे आचार्यांनी ओळखले. महारुद्र ते दृश्य पाहून स्तंभित झाला. ज्या अचार्यांशी लढताना तो व त्याचे सहकारी यांची दमछाक झाली होती. तिथे त्यांना कृष्णवर्णीय नाजूक देहाची वीरांगना असलेली मूर्ती तलवारबाजित मात देत होती. थोड्या वेळाने त्रिशलाने इशारा केला. तिचा इशारा समजला त्यानुसार अंबाला खाली झुकली. व वेगाने त्रिशलाने सोडलेल्या बाणाने आचार्यांचे हृदय छेदले. आचार्य खाली कोसळले.

इतके अचूक संधान महारुद्राने दुसऱ्यांदा पाहिले होते. एक त्रिशला व आता ही नेमबाज. आचार्यांचे काम फत्ते झाल्यावर त्रिशलेने इशरा केला. तसे चपळाईने अंबाला तिच्याजवळ गेली. व त्या तिथून निघाल्या.

त्यांना जाताना पाहून महारुद्र, “थांबा , आपला परिचय तरी करून द्या.”

घोषाधारी अंबाला, “ तू आमच्या विषयी जास्त जाणून घेऊ नकोस त्यापेक्षा तुझ्या जखमी साथीदारांना वाचव.”

असे बोलून त्या जवळील झाडीत गुप्त झाल्या.

क्रमशः पुढे.......


No comments:

Post a Comment

This is not government websites only private , here deta is a calect to gather our saround see and hearing deta so you check to government websites and agree whit it.

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...