Saturday, March 11, 2023

अंबाला भाग २४

 अंबाला भाग २४



तिच्या प्रकाशात त्या वानर सेनेचा सामना करत होत्या. काही माकडे उड्या मारत आंबलेच्या समोर असणाऱ्या फांदीवर आली. ती तिच्याकडे रागीट नजरेने पाहत वाकुल्या दाखवत पाहू लागली. अंबालेने वरील फांदीच्या पारंबीच्या साहाय्याने तिने पुढे येत त्यानं फांदीच्या टोकापर्यंत दामटले. त्यामुळे त्यांच्या वजनाने फांदीचा शेंडा वाकला. आंबेने पायाच्या साहाय्याने फांदी हलवण्यास सुरवात केली. तशी ती माकडे घाबरली. व एकमेकास बिलगली. व त्यांनी फांदी घट्ट पकडली. तेव्हा आंबलेने फांदी हलवायचे थांबवले. थोडावेळ फांदी हलत्याली थांबल्यावर त्या माकडांच्या हाताची पक्कड सैल केली. व ती एकमेकांना धरून बसलीत. याचा फायदा अंबालेन घेतला. व अचानक फांदी हलवली. एखाद्या डहाळीची लगडलेली फळे वाऱ्याने खाली पडवीत तशी ती माकडे टपटप पडली. त्या दोघी जवळजवळ चार पाच घटिका त्या दोघी माकडाशी लढत होत्या. शेवटी माकडांनी माघार घेणे योग्य समजले. कारण या दोघींनी त्यांना चांगलाच प्रसाद प्रत्येकाला दिला होता. त्या दोघी ही जखमी झाल्या होत्या दोघीही खूप जखमी झाल्या होत्या. माकडे माघारी गेल्यावर त्या दोघींनी विचार केला की उघड्या बुंध्यावर विसावा घेणे धोक्याचे आहे. व त्या दोघी सुरक्षित जागा शोधू लागल्या. तेव्हा त्यांना तिथे जवळच एक विशाल ढोली दिसली त्यांनी पेटते कोलीत घेऊन त्यांनी तिथे एक सुरक्षित जागा शोधली. व तिथे विसावा घ्यायचे ठरविले. त्या तिथे विसावल्या. त्यांना झोप कधी लागली हे देखील कळले नाही. पूर्वेस प्रभा दिसू लागली. सुर्य नारायण आकाशी चढू लागला. त्याचे कवडसे झाडीच्या पानाच्या मधून पडू लागले. त्याचा एक कवडसा अंबेच्या चेहेऱ्यावर पडला. तिला जाग आली. तिने त्रिशलेस उठवले. दोघी ढोलीतून बाहेर आल्या. पिशवीतले थोडे पानी पिऊन त्यांनी तृषा भागवली. त्यांनी तिथे पडलेल्या त्या मृत माकडास तेथील धगधगणाऱ्या अग्नीत टाकले. त्याचे काही मिनिटात अंत्यसंस्कार झाले. तदनंतर त्यांनी तो अग्नी शांत केला. व त्या दोघी आपले साहित्य व शस्त्रे घेऊन पुढे दक्षिण कुंतल प्रदेशाकडे निघाल्या. उंच पर्वत श्रृंखला पार करत त्या दक्षिण कुंतल प्रदेशात असणाऱ्या नदी खोऱ्यात उतरल्या. व नदीतिराने चालू लागल्या. पुढे सुरक्षित पठारी मैदानात आल्यावर त्या दोघींनी जवळील पिशवीत काय मिळते का ते पाहिले.

त्यातील शिल्लक असणारे खाद्य पदार्थ खाऊन पाण्याच्या पिशवीतले पाणी पिऊ लागल्या. ते संपले होते. तेव्हा त्या पाणी पिण्यासाठी त्या नदीकाठी गेल्या. तेथे त्या पाणी पिऊन स्नान कर्मे आटोपली. आपली वस्त्रे धुवून नदीतील उघड्या खडकावर त्यांनी सुखावली. नंतर त्या पुढे निघाल्या. उंच टेकावर चढून त्यांनी सर्वत्र पाहिले. त्यांना आकाशात धूर दिसत होता. तिकडे न्याहाळत बांबू बेटाच्या सहवासात त्यांना वस्ती दिसू लागली. दासी दुश्यलेने सांगितलेल्या खाणाखुणांनुसार त्यांनी अंदाज घेतला. व त्या नदीतिराने निघाल्या. पुढे अरण्य संपण्या आधी एका ठिकाणी झाडाखाली आपल्या पिशव्या ठेवल्या. तिथे जवळच असणाऱ्या जाळीत त्रिशलाने अंबेस नेले. व आपल्या कापडी पिशवीत असणारी अपरान्त देशात घेतलेली काजळीची डब्बी काढली. व ती अंबालेस लावू लागली.

ते पाहून अंबाला, “ हे काय लावत आहेस.”

त्रिशला, “ ही कजळी आहे. एकदा लावली की एक पक्ष टिकते. तुझा गौर वर्ण मी याने लपवत आहे. तुला कृष्ण वर्णी बनवत आहे. कारण सर्व राजपाट गेला आहे. नाहक जीव गमवयला नको. आज तुला कृष्णवर्णी व्हावेच लागेल. अशा तऱ्हेने त्रिशला तिच्या अंगावर काजळी लावू लागली. अंबाला आपली गौरवर्णी त्वचा शेवटची न्याहाळत होती. तिच्या डोळ्यातून आपल्या माता पित्याच्या आठवणी जाग्या होऊन अश्रू गळत होते. त्रिशलेस ही वाईट वाटत होते. काही क्षणात तिने तिला कृष्णवर्णी करुन टाकले. आपला सर्व व्यवहार आटोपून अरण्यातील काही फळे खाऊन त्या दोघी पुढे मार्गस्थ झाल्या. कुंतल खोऱ्यातील वस्ती जवळून जाताना त्या प्रत्येक ग्रामी चौकशी करत होत्या. त्या शेवटी दुश्यलेचा भाऊ राहत असलेल्या पारधी वस्तीवर आल्या.तिथे आल्यावर त्यांनी चौकशी केली. तेव्हा त्यांना समजले की गतवर्षी आलेल्या महापुरात दुश्यलेचा भाऊ नदीच्या पाण्यात वाहून गेला. व वस्तीवरील त्याचे घरात आता त्याची वृध्द माताच राहते. तिचे नाव महदव्वा आहे. त्या दोघींनी आपली ओळख पटावी म्हणून ग्रामनायकास दुष्यलेने दिलेली निशाणी दाखवली. व आपण दोघी दुस्यलेच्या मुली आहोत. असे सांगून त्या दोघींनी आपल्यास ते घर दाखवण्याची विनंती केली. पारधी वस्तीवर आलेल्या या नवीन मुलींना आश्रय देण्याचे सर्व पारध्याने ठरविले. कारण सदर भाग हा त्यांना राहावयास महाराज जयवर्धन यांच्या कृपेने मिळाला होता. व त्या मुली असलेने त्यांनी लगेच त्यांना दुष्यलेच्या भावाच्या घरी पोहचवले. तिथे येताच तिथली अस्वच्छता पाहून अंबालेस शिषारी आली. पण आता तिला तेथेच राहावे लागणार होते.

आपल्या म्हातारपणात आपल्या रक्ताचे असे कोण तरी आपल्या सहवासात आले. याचा त्या वृध्द महदव्वेस खूप आनंद झाला होता. व ती सुखावली होती. पण जेव्हा तिला दुश्यला या जगात जिवंत नाही हे कळले. तेव्हा तिला अश्रू अनावर झाले. तिने खूप शोक केला. आता आपल्याला या मुलींचा आधार आहे हे तिने जाणले होते. त्या दोघी तिथे राहू लागल्या. त्यांनी हळूहळू त्या घराचा कायापालट केला. अंबाला व त्रिशलेने ती मोहरांची थैली परसात गुप्त जागी लपवली. तसेच ती शस्त्रे ही. त्रिशला अंधाऱ्या रात्री न चुकता आंबेस कृष्णवर्णी बनवत होती.

त्या दोघी आता पारधी मुलीबरोबर रानात जात मद, लाख गोळा करत शेती करत जीवन कंठू लागल्या.

अधून मधून बाहेर गेलेले पारधी वस्तीवर आल्यावर राज्यातील वार्ता सांगत असत. एके दिवशी एक पारधी स्त्री सांगत होती. की महाराज जयवर्धन यांना युद्धात लढता लढता वीरमरण आले. व अश्मक खोरे ते राजधानी पर्यंत असणारा भाग शत्रूने जिंकून घेतला. उरलेला प्रदेश व दक्षिण कुंतल भाग शत्रूला नमवून प्रधान वेद दत्त यांनी जिंकला. व आता ते राजा झाले आहेत. व त्यांनी स्वतः चा राज्याभिषेक करून घेतला आहे. ही बातमी कळताच आंबलेस खूप दुःख झाले. पण तिने शोक आवरता घेतला. त्रिशलेन तिची समजूत काढली. रोज काही ना काही राजकीय घडामोड समजत होती. रानात काम करत त्या वृध्द महदव्वेसोबत त्या जीवन कंठू लागल्या. जे नाजूक हात रेशमी रुमालाने पुसत रोज पंचपक्वानांचे घास पोटात ढकलत. ते आता तेथील रानात कसत होते. त्रिशला तिला धीर द्यायची. अंबाला दिसावयास काळी असलेने तिचे सौंदर्य हे त्यात ही खुलत होते. त्या दोघी तिथे सुरक्षित होत्या.

पारधी लोकांत राहून त्या वेताच्या वस्तू तयार करणेस शिकल्या. एके दिवशी आंबलेने एक सुंदर वेताचा धनु बनवला. व अनेक शर तयार केले. तिला तिच्या गुरूकडून त्या शरावर लावायची औषधी कशी तयार करतात हे तंत्र माहीती झाले होते. ती औषधी तिने तयार केली. ते शर पिसे लावल्यास वेगाने संधान करू शकतात हे ती जानत होती. तिने रानातील पक्षांची पिसे गोळा केली. व त्या शराला लावली. व अशा प्रकारे तिने आपल्यासाठी व त्रिशलेसाठी एक असे दोन धनु बनवले. ते पाहून अनेक वृध्द पारधी तिचे कौतुक करत. त्या दोघींना अनेक पारधी मुले मागणी घालत. पण महदव्वा त्यांचे काही चालू देत नसे. त्या धाडशी असल्याने त्यांची छेड कोणी काढत नसे. कारण एकदा एका पारधी नवयुवकाने त्रिशलेची छेड काढली. त्या दोघींनी त्यास एका वृक्षास उलटे लटकावले. त्या क्षणापासून पारध्यांची मुले त्या दोघींपासून सावध राहत होती.

क्रमशः पुढे.....

No comments:

Post a Comment

This is not government websites only private , here deta is a calect to gather our saround see and hearing deta so you check to government websites and agree whit it.

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...