अंबाला भाग २०
आचार्य यांचा आश्रम विशाल व खूप मोठा होता. निसर्गरम्य अशा सह्याद्री पर्वत श्रृंखलेत असल्याने त्या परिसरात अजस्त्र अशी वनसंपदा होती. महारुद्र तेथील अरण्यातून वेगवेगळी फळं गोळा करून आणून देऊन तो सर्वांच्या भोजनाची तयारी करत असे. तो हळूहळू त्यांच्या वेगवेगळ्या कला पाहून त्याचे अनुकरणाने वेगवेगळ्या कला शिकला.
आचार्य यांची देखील तो सेवा करीत असे. आचार्य यांनी त्यास स्वसंरक्षण व वाचन लेखन करण्यास शिकवले. त्यामुळे त्यास अश्मक व कुंतल प्रदेश तसेच अपरांत देशातील भाषांचा वापर करणे त्यास जमू लागले. तो एक भिल्ल असलेने त्याने आश्रमातील साधूंनाही बांबू पासून वेगवेगळ्या वस्तू बनवणेस शिकवले. ज्याने एखादे प्रदेशात भिक्षा न मिळाल्यास भिक्षू अशा तऱ्हेच्या वस्तू बनवून विकतील व उदरनिर्वाह करतील.
दिवस सरू लागले. महारुद्र गुरू परवानगीने आपल्या माता पित्यास भेटनेस जात असे. आता सहा वर्ष झाली त्यास या आश्रमात येऊन. त्याने तिथे बरेच विद्यार्जन केले. त्याचा स्वभाव ओळखून आचार्यांनी त्यास राज्यशास्त्र, व इतर सर्व ज्ञान दिले. ज्याने तो एक कुशल वीर म्हणून तयार झाला.
सहा वर्षात त्याने बारा वर्ष घ्यायचे ज्ञान ग्रहण केले. विद्यार्जन झाल्यावर आचार्यांनी त्यास रीतसर निरोप दिला. त्या बरोबर आपल्या काही शिष्यांना देखील निरोप दिला. मेघदूत आचार्यांच्या सांगण्याने ते धम्म प्रचारार्थ निघून गेले. महारुद्राने गो दान करून आचार्य यांचा निरोप घेतला. निरोप घेताना आपण शिकवलेल्या विद्येचा दुरुपयोग वा कुणा निर्दोष व्यक्तीस त्रास न देण्याचे वचन त्यांनी घेतले.
तेथून निरोप घेतल्यावर महारुद्रास ती कृष्णवर्णी कन्या आठवली. तो तिच्या शोधार्थ पून्हा त्या महादेव नगरात गेला. तेथे त्याने सर्वत्र शोध घेतला. पण ती त्यास दिसली नाही. शेवटी निराश होऊन तो परतला. व थेट दक्षिण कुंतल प्रदेशातील आपल्या गावच्या दिशेने मार्गस्थ झाला. वाटेत एका नगरात थांबून तिथे काही रोजगार करून त्याने काही द्रव्य मिळवले. तद नंतर त्याने तेथील लोहाराकडून एक सुंदर तलवार बनवली. तसेच काही शस्त्रे ही बनवली. नंतर तो आपल्या वस्ती वर आला. त्याने तिथे येताना आपल्या भिल्ल लोकांना सुधारून त्यांचा विकास करायचे ठरवले.
महारुद्र आता खूप मोठा झाला होता. तारुण्याची लक्षणे त्यात दिसू लागली होती. नियमित व्यायामाने त्याने आपले शरीर कसोशीने तयार केले. आता तो सुंदर गौरवर्णी रंगाचा देखणा तरुण पाहून सर्व त्याकडे पहात असतं. भिल्लम व सिंघणेस अभिमान वाटे. व त्यांना आपल्या कष्टाचे चीज झाल्या सारखे वाटे. त्याने अनेक भिल्ल तरुणांना एकत्र करून त्याने त्यांना शस्त्र ज्ञान दिले. व आपली वस्ती ही सुधारली. तसेच अनेक भिल्ल कुमारांना स्वावलंबी केले. त्यामुळे भिल्लांची प्रगती झाली.
पण सदर काळात महाराज जयवर्धन यांच्या राज्यावर परचक्र चालून आले होते.
…… ……. ……. ……. ….. ….. …… ……
महाराज जयवर्धन यांचा राजपाट चांगला चालला होता. त्यांच्या राज्यास अश्मक खोऱ्यातील बंडखोरीने ग्रासले होते. उत्तर सीमेवरून होणाऱ्या हल्ल्यांनी राज्याचा हा परिसर अशांत असे. उत्तर सीमेवरील राजे नेहमी कुरघोडी करत. महाराज जयवर्धन आपल्या प्रजेची काळजी मुलांप्रमाणे घेत असत. त्यांनी केलेली सुधारणा तसेच राज्यमार्ग यातायात व कृषी क्षेत्रातील प्रगती याने राज्याची भरभराट झाली होती. त्यामुळे कुंतल प्रदेशाची ख्याती सर्वदूर पसरली होती. त्यामुळे परराज्यातील लोक तिथे येऊन वास्तव्य करू लागले होते. विस्तृत नगरे, नगरांची व्यवस्था, व्यापारी क्षेत्रात झालेली प्रगती पाहून अन्य राज्यांचा जळफळाट होत असे. शत्रूचे हेर राज्यातून फिरत असतं. त्यांच्या कारवायांमुळे राज्याच्या उत्तर प्रांती नेहमी कोणते ना कोणते संकट येत असे. महाराज जयवर्धन यांनी अनेक बंडखोरांना शासन केले होते. पण काहीना काही घडे. प्रधान वेददत्त राजपाटात मदत करत असत. राजकुमारी ही आता तरुण झाली होती. ती त्या गुप्त मार्गे राजमहाला बाहेर जात असे. पण आता राज्यातील अशांतता निर्माण झाल्यामुळे महाराजांनी सर्वत्र कड्क व्यवस्था ठेवली होती. त्यामुळे गुप्त मार्गावर ही पहारा ठेवला. त्यामुळे राजकुमारीच्या सर्व योजनांवर निर्बंध आले होते. राजकुमारी रूप पालटून गुप्त मार्गे जाते हे महाराणी अरुणावती यांच्या पट्ट दासीने हेरले होते. तिने ही गुप्त वार्ता राणीच्या कानावर घातली होती.
महाराणी अरुणावती एके दिवशी महालातील मुख्य दालनात बसल्या होत्या. अनेक दासी त्यांच्या सेवेत होत्या. इतक्यात दुश्यला त्यांच्या समोर आली. व त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन,
दुशला, “ महाराणींचा जयजयकार असो.”
महाराणी अरुणावती, “ बोल दुशले काय वार्ता आहे.”
दुश्यला, “ महाराणी मी एक विशेष वार्ता सांगणार आहे. तरी….”
महाराणी अरूणावती, “ एकांत..”
इतर सेवक व दासी कक्षा बाहेर जातात. महाराणी व दुश्यला दोघीच तिथे त्या दालनात असताना…
दुश्यला त्यांच्या कानात काहीतरी कुजबुजत ते ऐकूण महाराणी,
“ मला वाटलेच होते. की राजकुमारी काही ना काही आगळीक खोड्या करतेय. आजपासून त्या ठिकाणी कडक पहारा ठेवा. व मध्यरात्री गुप्त भुयारी मार्ग दुसऱ्या मार्गे बंद करावा. मुजवून द्यावा. त्या परिसरातत गुप्त पहारा ठेवावा.”
महाराणीच्या सांगण्यानुसार त्या दिवशी दुश्यलाने दोन खात्रीचे सैनिक घेऊन तो गुप्त मार्ग जंगलाच्या वाटे मुजवला. व जंगल वाटेवर पहारा बसवला. व ही वार्ता येऊन महाराणींना सांगितली. बातमी ऐकूण महाराणी निश्चिंतत झाली.
गुप्त मार्गावर पहारा बसताच राजकुमारीस हि वार्ता समजली. तिला राग आला. ती थेट महाराणीच्या कक्षात आली. तेथे आल्यावर चिडलेली अंबाला, “एकांत…..”
सर्व दासी व सेवक तिथून बाहेर जातात. ते गेल्यावर
अंबाला, “ आई साहेब आपण गुप्त मार्गावर पहारा का ठेवलात.”
महाराणी अरुणावती, “ महालाच्या व आपल्या सुरक्षेसाठी.”
अंबाला, “ मी आता मोठी झालेली आहे. मी स्वतःच संरक्षण करू शकते.”
अरूणावती, “ थोडीशी विद्या ग्रहण केलं की जास्त आपल्याला कळतं अस नाही.”
अंबाला, “ याचा अर्थ…”
अरुणावती, “ बुद्धिवान लोकांना स्पष्टीकरण द्यावे लागत नाही.”
अंबाला, “ याचा अर्थ तुम्ही आम्हास बुद्धिहीन समजता तर.”
अरुणावती, “ हो. जर आपण सुज्ञ असता तर असे गुप्त मार्गे ये जा करून महालाची सुरक्षा धोक्यात नसती आणली असती.”
अंबाला, “ या बद्दल माफी असावी. पण…”
आरुणावतीं, “ पण वगैरे काही नाही. आपल्या काळजीस्तव आम्ही तो निर्णय घेतला आहे. उत्तर सीमेवर शत्रू डेरा टाकून आहे. राज्य सुरक्षेसाठी महाराज गुंतलेत. अन् तुम्ही तुमच्या या तारुण्य सुलभ गौण विचारातून बाहेर या. व पाहा. उद्यापासून शिपायांच्या देखरेखीत राज्याचा हालहवाला पाहून घ्या. आपणास नगरात प्रकट फिरण्याची मुभा देण्यात येईल. पण काळजी घ्या.”
महाराणींचे बोलणे ऐकताच ती चिडून अंतपुरात आपल्या दालनात गेली. नंतर महाराणीनी तिची तिथे जाऊन समजूत काढली.
……. ……. .. .. …….. …… ….
क्रमशः पुढे……








